नारायण जाधव, ठाणे - ठाणे जिल्ह्यातील सात महापालिकांसह मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील आठ नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीत राहणार्यांच्या उत्थानासाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करता येणे शक्य आहे का किंवा अन्य कोणती योजना राबविणे शक्य होईल, याच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली आहे़ या गटाने दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करावा, असे बंधन विभागाने घातल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील १५ शहरांतील झोपडपट्टीत राहणार्या लाखो गोरगरिबांचे सुसज्ज घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे़ मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, वसई-विरार या सात महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, खापोली, माथेरान या नगरपालिकांचा समावेश आहे़ या सर्व शहरांतील (पान ४ वर)
ठाणे जिल्ह्यात ‘झोपु’
By admin | Updated: May 31, 2014 05:08 IST