शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

भाजपाला मुंबईपेक्षा ठाण्याचा पेपर कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 02:47 IST

निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे

ठाणे : निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र दिसेल, असे बोलले जाते. ठाण्यापेक्षा मुंबईत शिवसेनेला धक्का देणे अधिक सोपे असल्याचे व अभिमानास्पद असल्याचे भाजपाचे नेते खासगीत बोलत आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेना हाच मोठा भाऊ राहील हे भाजपाच्या नेत्यांना मान्य आहे. केडीएमसीत युती तोडून शिवसेना आणि भाजपा प्रथमच स्वबळावर लढले होते. त्यानंतर, सत्तेसाठी मात्र पुन्हा एकत्र येऊन या दोघांनी सत्तेचा सारीपाट मांडला. आता ठाण्यातदेखील तीच परिस्थिती असून या कल्याण-डोंबिवलीतील नाटकाचा दुसरा अंक ठाण्यात रंगणार आहे. ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे युतीत असलेले शिवसेना-भाजपा आता आपसात लढणार आहेत. त्यामुळे यापूर्वी रंगणारा शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी हा सामना आता ठाणेकरांना पाहावयास मिळणार नसून त्या जागी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी जुंपल्याचे दिसणार आहे. विधानसभेनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. २५ वर्षांत काय केले, असे म्हणून ठाण्यात आता भाजपा खऱ्या अर्थाने आपल्या मित्रपक्षाचा अपप्रचार करण्यास सज्ज झाली आहे. मुंबईत शिवसेनेविरोधात प्रचार सुरू केल्यानंतर ठाण्यातही शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकण्यास भाजपा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ज्या पद्धतीने भाजपाने इतर पक्षांतील नगरसेवक आपल्या पक्षात आणून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा प्रयत्न आता केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात शिवसेनेचा सामना मित्रपक्ष भाजपाबरोबरच राष्ट्रवादी बरोबर होणार आहे. केडीएमसी निवडणुकीच्या वेळेस भाजपाने शिवसेनेला ‘सळो की पळो’ करून सोडले होते. (प्रतिनिधी)