शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मुंबईपेक्षा ठाण्याचा पेपर कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 02:47 IST

निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे

ठाणे : निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र दिसेल, असे बोलले जाते. ठाण्यापेक्षा मुंबईत शिवसेनेला धक्का देणे अधिक सोपे असल्याचे व अभिमानास्पद असल्याचे भाजपाचे नेते खासगीत बोलत आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेना हाच मोठा भाऊ राहील हे भाजपाच्या नेत्यांना मान्य आहे. केडीएमसीत युती तोडून शिवसेना आणि भाजपा प्रथमच स्वबळावर लढले होते. त्यानंतर, सत्तेसाठी मात्र पुन्हा एकत्र येऊन या दोघांनी सत्तेचा सारीपाट मांडला. आता ठाण्यातदेखील तीच परिस्थिती असून या कल्याण-डोंबिवलीतील नाटकाचा दुसरा अंक ठाण्यात रंगणार आहे. ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे युतीत असलेले शिवसेना-भाजपा आता आपसात लढणार आहेत. त्यामुळे यापूर्वी रंगणारा शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी हा सामना आता ठाणेकरांना पाहावयास मिळणार नसून त्या जागी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी जुंपल्याचे दिसणार आहे. विधानसभेनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. २५ वर्षांत काय केले, असे म्हणून ठाण्यात आता भाजपा खऱ्या अर्थाने आपल्या मित्रपक्षाचा अपप्रचार करण्यास सज्ज झाली आहे. मुंबईत शिवसेनेविरोधात प्रचार सुरू केल्यानंतर ठाण्यातही शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकण्यास भाजपा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ज्या पद्धतीने भाजपाने इतर पक्षांतील नगरसेवक आपल्या पक्षात आणून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा प्रयत्न आता केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात शिवसेनेचा सामना मित्रपक्ष भाजपाबरोबरच राष्ट्रवादी बरोबर होणार आहे. केडीएमसी निवडणुकीच्या वेळेस भाजपाने शिवसेनेला ‘सळो की पळो’ करून सोडले होते. (प्रतिनिधी)