शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मधुर, रसाळ हापूस आला ठाणेकरांच्या आवाक्यात!

By admin | Updated: April 26, 2016 03:43 IST

हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे.

ठाणे : हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे. आंब्यांचा आकार, दर्जा यानुसार सध्या हापूसचे दरही ३०० ते ४०० रूपयांपासून सुरू होत असल्याने त्यांचा घमघमाट आता मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आला आहे. पाडव्याच्या अगोदर माफक आवक असलेल्या आंब्याने आपला आब कायम ठेवत डझनाला १६०० रूपयांपर्यंतचा भाव मिळवला होता. एप्रिलच्या अखेरीपासून आवक वाढत गेली, तसतसा दरही हळूहळू उतरत गेला आणि देवगड-रत्नागिराच्या हापूसपासून वेगवेगळ््या ठिकाणचा आंबा आपला आकार, दर्जा यानुसार आवाक्यात आला. मार्चमध्ये असलेले आंब्याचे दर पाहता सर्वसामान्य ठाणेकर खरेदीकडे फिरकतच नव्हते. मात्र, आता दर हळूहळू कमी होत असल्याने आंब्याच्या खरेदीकडे खवय्यांची पावले वळू लागली आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत ३०० रूपयांपासून पार हजार रूपयांपर्यंत आंबे मिळत आहेत. देवगड, रत्नागिरीच्या आंब्याचे दर साधारण सारखेच असून सर्वात लहान आंब्याचे दर ३०० च्या घरात आहेत. काही विक्रेते रायवळ आंब्याचीही विक्री करताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)