शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर

By admin | Updated: September 30, 2016 02:36 IST

जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात

ठाणे : जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ वनराई बंधारे झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात आढावा घेतला. विभागात वनराई बंधाऱ्यांचे काम उत्तम झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ बंधारे झाले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाच जिल्ह्यांमधील १७ हजार ४४२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.कोकणातील ५० हजार हेक्टर पडीक जमिनीवर नरेगाची कामे घेतली जाणार आहेत. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंबालागवडीसाठी पाच बाय पाच ही नवीन अट लागू केली आहे. यानुसार, आंबापीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान नरेगाद्वारे दिले जाणार आहे. मागेल त्या शेतकऱ्यास शेततळ्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘ठाणे सहज’ या मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा वगळताठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सिंधुदुर्गचे दीपक केसरकर, रत्नागिरीचे रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मार्चअखेरपर्यंत कोकण हगणदारीमुक्त - स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आला आहे. कोकणातील ६४ टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ३३ टक्के ग्रा.पं. २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्यात ६२ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. यात कोकण विभागात सरासरी ८३ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत, असे त्यांनी सांगितलेसेवा हमी कायदा - यामध्ये १३ सेवा देण्याची कामे दिली आहे. यासाठी पाच जिल्ह्यांमधून चार लाख ४४ हजार ८५० अर्ज दाखल झाले. त्यातील चार लाख ४४ हजार ८०५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित ८२ अर्जदार प्रथम सुनावणीस गेले. त्यावर, निर्णय झाला असून फक्त द्वितीय सुनावणीत चार अर्ज शिल्लक असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)सिंचन विहिरी कोकणात ६ हजार १२३ सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. त्यातील ३ हजार ३३७ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २ हजार २९० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत.कृषिपंपांची जोडणीविभागात ५ हजार ८४५ कृषिपंपांची कामे हाती घेतली आहेत. यातील १ हजार ९१० पंपांना आतापर्यंत वीजजोडण्या दिल्या आहेत. उर्वरित ३ हजार ९३५ जोडण्या शिल्लक आहेत.आवास योजनाविभागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या १३ हजार ९९७ घरांपैकी १२ हजार ७६० घरांसाठी पहिल्या हप्त्याचे अनुदान देण्यात आले आहे. दुसरा हप्ता लवकरच ४हजार ५३८ घरांसाठी देण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरपर्यंत ९० टक्के, तर मार्चपर्यत उर्वरित १० टक्के घरांचे काम पूर्ण होणार आहे. रमाई आवास योजनेद्वारे ३ हजार ७३५ घरांची कामे हाती घेतली आहेत.