शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
4
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
5
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
6
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
7
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
8
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
9
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
11
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
12
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
13
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
14
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
15
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
16
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
17
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
19
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...

सेनेने काबीज केले ठाणे

By admin | Updated: May 17, 2014 01:59 IST

लोकसभा मतदारसंघात आधी भाजपाचा आणि मग शिवसेनेचा बालेकिल्ला होता. अपवाद फक्त काही काळ खासदार झालेल्या काँग्रेसच्या शांताराम घोलपांचा.

 लोकसभा मतदारसंघात आधी भाजपाचा आणि मग शिवसेनेचा बालेकिल्ला होता. अपवाद फक्त काही काळ खासदार झालेल्या काँग्रेसच्या शांताराम घोलपांचा. हा शिवसेनेचा गड राम कापसे आणि प्रकाश परांजपे यांनी सातत्याने राखला. त्याला २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजीव नाईकांनी सुरुंग लावला. समाजातील व नाईक परिवारातील तरुण सुशिक्षित उमेदवार म्हणून ठाणेकरांनी त्यांना संधी दिली. त्यांच्या या विजयात मनसेच्या राजन राजे यांनी घेतलेल्या लाखांहून अधिक मतांचा व शिवसेनेने विजय चौगुलेंसारख्या उमेदवाराला संधी दिल्याचा मतदारांत असलेला राग या दोन घटकांचा सिंहाचा वाटा होता. हे समजून घेण्यात नाईक परिवार आणि राष्ट्रवादी या वेळी असमर्थ ठरले. त्यातून संजीव नाईकांचा पराभव घडून आला. शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली तेव्हा एकदम कच्चा उमेदवार दिला आता काळजीचे कारण नाही अशी उद्दाम भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली. मनसेने अभिजित पानसेंसारख्या इम्पोर्र्टेड आणि नवशिक्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे आता तर आपला विजय निवडणुकीपूर्वीच निश्चित झाला आहे. अशा भ्रमात राष्ट्रवादी होता. काँग्रेसवाल्यांना तर कोणाच्याही हातून का असेना नाईक कुटुंबांच्या राजकीय वर्चस्वाचे नाक कापले गेले तर हवेच होते. त्यामुळे त्यांनी नाईकांना सावध करण्यापेक्षा भ्रमातच ठेवणे पसंत केले. संजीव नाईक यांचा पराभव त्यांनी आणि त्यांच्या पिताश्रींनी ओढावून घेतला आहे. निवडणूक जरी लोकसभेची असली तरी, काहीही झाले तरी आता संजूबाबा नकोच अशी मतदारांची मानसिकता गेल्या पाच वर्षांत हळूहळू साकारत गेली. मी मंत्री, मी आमदार, माझा मुलगा खासदार माझा मुलगा आमदार, पुतण्या, महापौर अशी राष्ट्रवादीतील सगळ्यात मोठी घराणेशाही नाईकांनी आरंभीली. त्यामुळे स्व-पक्षातलेच नेते, कार्यकर्ते, नगरसेवक धुमसायला लागले. अगदी महापालिकेतील ठेके आणि कामातली टक्केवारीसुद्धा गणेशार्पण होऊ लागल्याने मग आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायला आणि सभेला गर्दी गोळा करून टाळ्या पिटायलाच पक्षात आलो की काय, असा सवाल ते करू लागले. त्यात पवारांनी हाफ चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार काय? असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचाही फटका बसला. महायुतीच्या व्होट बँकेला सुरुंग लावण्यासाठी मनसेची उमेदवारी उपयुक्त ठरेल असे घड्याळजी समजत होते. पण ती संजीव यांच्याच यशाच्या मुळावर उठली. मुन्नाभाईसदृश डॉक्टर होण्याचा त्यांचा प्रयत्न अंगाशी आला. तसेच मुझफ्फर हुसेन यांनी पुकारलेले मीरा-भार्इंदरमधील बंड व पुतणे वैभव नाईक यांनी नवी मुंबईतच संजीव यांना पराभूत करण्याचा उचललेला विडा या सगळ्या बाबी नाईकांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यात. यापासून आता नाईक पिता-पुत्र धडा घेतील का?