शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:44 IST

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. त्यानंतर ती आजीबाई कसेबसे ठाणे रेल्वे स्थानकात आली. याचदरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिच्या सुनेचा शोध घेतला. पण, ती शोधून न सापडल्याने अखेर तिला मदत म्हणून रेल्वे तिकीट आणि खर्चाला पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवून घरी धाडले.लक्ष्मीबाई (नाव बदलेले आहे) आणि त्यांची सून या दोघी तळोजा जेलमध्ये न्यायबंदी असलेल्या मुलाची शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्याची तारीख असल्याने त्याला भेटण्यासाठी सकाळी ठाण्यात आल्या. दुपारी भेट झाल्यानंतर दोघीही पायी ठाणे रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी परताना त्या ठाणे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला गेल्या. याचदरम्यान, गर्दीतून आजीबाई सुनेच्या दिशेने जात असताना, अचानक दोन-तीन बस आणि एका मागून एक आल्याने काही वाहनांमुळे त्यांची ताटातूट झाली. गर्दी कमी झाल्यावर आजीबार्इंनी सुनेचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने मोठ्या धीराने त्यांनी लोकांना विचारत कसेबसे ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत सांयकाळचे ५.३० वाजले होते. सून रेल्वे स्थानकात असेल म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आजीबार्इंना रेल्वे प्रशासनाने धीर देऊन विचारपूस केली. त्यावेळी आजीबाई अक्कलकोट येथे राहणाºया असल्याचे समोर आले.आजीबार्इंच्या कपड्यांवरून त्या गरीब घरातील असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडील एका पिशवीत पाण्याची बाटली आणि अवघी दहा रुपयांची नोट होती. याचदरम्यान, अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री १०.३५ ची कुर्ला- कोईम्बतूर एक्सप्रेस असल्याने तब्बल पाच तासांचा मुक्काम आजीबार्इंचा प्रबंधक कार्यालयात होता. नाश्ता आणि रात्रीचे जेवण करून त्या एक्सप्रेसने आपल्या घराकडे रवाना झाल्या.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने या वृद्ध महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन तिला सर्वतोपरी मदत करून आपल्या नातलगांपर्यंत जाण्याकरता मदत केल्याबद्दल प्रवासी संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणारे कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे