शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
3
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
4
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
5
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
6
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
7
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
8
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
9
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
10
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
11
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
12
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
13
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
14
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
15
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
16
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
17
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
18
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
19
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
20
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."

ठाणे रेल्वे स्थानकात २५ हजार फुकटे!

By admin | Published: July 08, 2017 5:39 AM

लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात मे ते जून २०१७ या ३ महिन्यांत सुमारे ५ हजार तर मागील वर्षभरात २० हजारहून अधिक फुकटे ठाणे स्थानकात टीसींंच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याकडून ६२ लाखांहून अधिक दंडही वसूल केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.ठाणे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने ते नेहमीच गजबलेले असते. येथे एकूण १० फलाट असून, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरिकरण होत असल्याने त्याचा स्थानकावर ताण पडतो.सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर ही पहिली लोकल धावली. या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली. त्यातच, मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाची मदत होत असल्याने या स्थानकात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. फुकट्यांना पकडण्यासाठी सुमारे २४ टीसींची मंजूर पदे आहेत. त्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात २० हजार २४५ विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे अशा प्रकारे फुकट प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.फुकट्यांमुळे रेल्वे मालामाल ठाण्यात पकडलेल्या फुकट्यांकडून जर ६२ लाख २८ हजार ५२७ रुपये वसूल केला आहे. जर त्यांनी तिकीट काढून प्रवास केला असता, तर रेल्वेच्या तिजोरी काही लाख रुपये जमा झाले असते. मात्र, या फुकट्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ६२ लाखांहून अधिक रक्कम दंड स्वरूपात जमा झाल्याने रेल्वे मालामाल झाली आहे.यंदा आकडा वाढला : २०१५-१६ मध्ये ठाण्यात ७ हजार ९९२ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २२ लाख ६३ हजार दंड वसूल केला होता. तर २०१६-१७ या वर्षात हा आकडा चक्क २० हजार २४५ वर गेल्याने फुटक प्रवास करताना पकडणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. तसेच त्यांच्याकडून ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले.