शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

ठाण्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले, दोन महिन्यात दहा कुपोषित बालकं दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:34 IST

पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे.

सुरेश लोखंडेठाणे, दि. 10 - पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे.  एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात पाच आणि सात बालके सणासुदीच्या ऑगस्ट महिन्यात दगावली. यात दोन अर्भक आहेत. या मृत्यूंमुळे प्रशासनासह जिल्हा परिषदेला सामाजिक संघटना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.मृत्युमुखी पडलेल्या बालकांमध्ये शहापूर तालुक्यातील तईचीवाडी-लेनाड येथील शेतमजूर रिद्धी वामन पारधी या मातेच्या दीड वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ठिले येथील बेबी निचिते यांची सव्वातीन महिन्यांची बालिका, अंबर्जे या गावातील अंकुश व विनोद या दोन भावांची मुले एका दिवसाआड दगावली. सुमारे दोन महिने कालावधीच्या या मुलांचे अनुक्रमे दोन किलो 500 ग्रॅम व एक किलो 500 ग्रॅम वजन असल्याचे नोंदवण्यात आले. कसा-याजवळील वाशहा खुर्द येथील उषा हौशा मुकणो या मातेची दीड वर्षाची बालिका दोन किलो 700 ग्रॅम वजनाची होती. भागदळ-दहिवली येथील ओमकार वाघ या मजुराचे 19 दिवसांचे बालक दगावले आहे. मुरबाड तालुक्यातील शिरोशीजवळील आळवे येथील बेबी बाबजी हिलम या मातेच्या प्रसूतीदरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे.  जुलैत शहापूर तालुक्यातील मढ गावातील दोन बालकांचा दोन दिवसाआड मृत्यू झाला. कासगावमधील तीन वर्षाची बालिका सेप्टीसेमियाने दगावली. याप्रमाणोच जून महिन्यात सहा मुले ठिकठिकाणची दगावली आहेत. सात बालके मे महिन्यात दगावली असून यात तीन बालिका व चार मुलांचा समावेश आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात चार वर्षाची एक आणि दीड महिन्याची एक अशा दोन बालिकांचा मृत्यू झाला आहे.