शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले, दोन महिन्यात दहा कुपोषित बालकं दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:34 IST

पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे.

सुरेश लोखंडेठाणे, दि. 10 - पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे.  एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात पाच आणि सात बालके सणासुदीच्या ऑगस्ट महिन्यात दगावली. यात दोन अर्भक आहेत. या मृत्यूंमुळे प्रशासनासह जिल्हा परिषदेला सामाजिक संघटना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.मृत्युमुखी पडलेल्या बालकांमध्ये शहापूर तालुक्यातील तईचीवाडी-लेनाड येथील शेतमजूर रिद्धी वामन पारधी या मातेच्या दीड वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ठिले येथील बेबी निचिते यांची सव्वातीन महिन्यांची बालिका, अंबर्जे या गावातील अंकुश व विनोद या दोन भावांची मुले एका दिवसाआड दगावली. सुमारे दोन महिने कालावधीच्या या मुलांचे अनुक्रमे दोन किलो 500 ग्रॅम व एक किलो 500 ग्रॅम वजन असल्याचे नोंदवण्यात आले. कसा-याजवळील वाशहा खुर्द येथील उषा हौशा मुकणो या मातेची दीड वर्षाची बालिका दोन किलो 700 ग्रॅम वजनाची होती. भागदळ-दहिवली येथील ओमकार वाघ या मजुराचे 19 दिवसांचे बालक दगावले आहे. मुरबाड तालुक्यातील शिरोशीजवळील आळवे येथील बेबी बाबजी हिलम या मातेच्या प्रसूतीदरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे.  जुलैत शहापूर तालुक्यातील मढ गावातील दोन बालकांचा दोन दिवसाआड मृत्यू झाला. कासगावमधील तीन वर्षाची बालिका सेप्टीसेमियाने दगावली. याप्रमाणोच जून महिन्यात सहा मुले ठिकठिकाणची दगावली आहेत. सात बालके मे महिन्यात दगावली असून यात तीन बालिका व चार मुलांचा समावेश आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात चार वर्षाची एक आणि दीड महिन्याची एक अशा दोन बालिकांचा मृत्यू झाला आहे.