शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

By admin | Updated: July 11, 2017 04:08 IST

स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी, अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची टूर पुढील आठवड्यात प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांना विविध प्रकारचा अभ्यास शिकवला जाणार आहे.ठाणे महापालिकेत यंदा १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, मागील कित्येक वर्षे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त सुमारे ४० टक्के नवीन नगरसेवक पालिकेत नव्याने निवडून आले आहेत. त्यांना पालिकेच्या कामकाजापासून इतर काहीच माहिती नसल्याने आणि महासभा, स्थायी समिती किंवा इतर समित्यांची कामे कशी चालतात, कशा प्रकारची शिस्त ठेवणे गरजेचे आहे, आदींसह इतर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यासह इतर सर्वच नगरसेवकांचा प्रशिक्षणाचा दौरा यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु, स्थायीचे बिघडलेले गणित आणि कोर्टाच्या वाऱ्या यामुळे हे प्रशिक्षण शिबिर लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मधल्या काळात हे शिबिर हैदराबादला घ्यावे, अशी मागणी झाली होती. त्यानंतर, पुन्हा माउंटअबू आणि आता पावसाळा सुरू होताच गोव्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. परंतु, हैदराबाद आणि माउंटअबूचा दौरा ज्या पद्धतीने त्यांनी रद्द केला, तसाच गोव्याचा कार्यक्रमही त्यांनी रद्द केला. तेथे जाऊन अभ्यासाच्या नावावर केवळ पुरुष नगरसेवक फिरण्याशिवाय काही करू शकणार नाहीत आणि महिला सदस्यांनाही ते ठिकाण रुचणार नसून ते खर्चिकही असल्याचे सांगून महापौरांनी गोव्यावर फुली मारली. त्यानंतर, आता महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी हे शिबिर घेण्याचे ठरले असून पुढील आठवड्यात दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील यशदा, अंधेरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या प्रख्यात संस्था असताना ठाण्यातील नगरसेवकांना महाबळेश्वरचा मोह कशाला झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही केवळ महाबळेश्वरची पावसाळी सहल ठरेल, अशी टीका आता होऊ लागली आहे. आतापर्यंत जे अभ्यासदौरे झाले, त्यांचे इतिवृत्त आतापर्यंत कधीच पटलावर ठेवलेले नाही, हे विशेष.