शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

By admin | Updated: July 11, 2017 04:08 IST

स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी, अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची टूर पुढील आठवड्यात प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांना विविध प्रकारचा अभ्यास शिकवला जाणार आहे.ठाणे महापालिकेत यंदा १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, मागील कित्येक वर्षे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त सुमारे ४० टक्के नवीन नगरसेवक पालिकेत नव्याने निवडून आले आहेत. त्यांना पालिकेच्या कामकाजापासून इतर काहीच माहिती नसल्याने आणि महासभा, स्थायी समिती किंवा इतर समित्यांची कामे कशी चालतात, कशा प्रकारची शिस्त ठेवणे गरजेचे आहे, आदींसह इतर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यासह इतर सर्वच नगरसेवकांचा प्रशिक्षणाचा दौरा यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु, स्थायीचे बिघडलेले गणित आणि कोर्टाच्या वाऱ्या यामुळे हे प्रशिक्षण शिबिर लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मधल्या काळात हे शिबिर हैदराबादला घ्यावे, अशी मागणी झाली होती. त्यानंतर, पुन्हा माउंटअबू आणि आता पावसाळा सुरू होताच गोव्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. परंतु, हैदराबाद आणि माउंटअबूचा दौरा ज्या पद्धतीने त्यांनी रद्द केला, तसाच गोव्याचा कार्यक्रमही त्यांनी रद्द केला. तेथे जाऊन अभ्यासाच्या नावावर केवळ पुरुष नगरसेवक फिरण्याशिवाय काही करू शकणार नाहीत आणि महिला सदस्यांनाही ते ठिकाण रुचणार नसून ते खर्चिकही असल्याचे सांगून महापौरांनी गोव्यावर फुली मारली. त्यानंतर, आता महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी हे शिबिर घेण्याचे ठरले असून पुढील आठवड्यात दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील यशदा, अंधेरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या प्रख्यात संस्था असताना ठाण्यातील नगरसेवकांना महाबळेश्वरचा मोह कशाला झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही केवळ महाबळेश्वरची पावसाळी सहल ठरेल, अशी टीका आता होऊ लागली आहे. आतापर्यंत जे अभ्यासदौरे झाले, त्यांचे इतिवृत्त आतापर्यंत कधीच पटलावर ठेवलेले नाही, हे विशेष.