शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

ठाण्यातील नगरसेवकांची महाबळेश्वरला पिकनिक

By admin | Updated: July 11, 2017 04:08 IST

स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्थायी समिती, महासभेसह पालिकेचे कामकाज कसे चालते, नगरसेवक म्हणून आपली जनतेप्रति काय भूमिका हवी, अशांसह विविध प्रकारच्या माहितीसाठी ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची टूर पुढील आठवड्यात प्रशिक्षणासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे समजते. दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात त्यांना विविध प्रकारचा अभ्यास शिकवला जाणार आहे.ठाणे महापालिकेत यंदा १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, मागील कित्येक वर्षे महापालिकेत तळ ठोकून बसलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त सुमारे ४० टक्के नवीन नगरसेवक पालिकेत नव्याने निवडून आले आहेत. त्यांना पालिकेच्या कामकाजापासून इतर काहीच माहिती नसल्याने आणि महासभा, स्थायी समिती किंवा इतर समित्यांची कामे कशी चालतात, कशा प्रकारची शिस्त ठेवणे गरजेचे आहे, आदींसह इतर कोणत्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यासह इतर सर्वच नगरसेवकांचा प्रशिक्षणाचा दौरा यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु, स्थायीचे बिघडलेले गणित आणि कोर्टाच्या वाऱ्या यामुळे हे प्रशिक्षण शिबिर लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मधल्या काळात हे शिबिर हैदराबादला घ्यावे, अशी मागणी झाली होती. त्यानंतर, पुन्हा माउंटअबू आणि आता पावसाळा सुरू होताच गोव्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. परंतु, हैदराबाद आणि माउंटअबूचा दौरा ज्या पद्धतीने त्यांनी रद्द केला, तसाच गोव्याचा कार्यक्रमही त्यांनी रद्द केला. तेथे जाऊन अभ्यासाच्या नावावर केवळ पुरुष नगरसेवक फिरण्याशिवाय काही करू शकणार नाहीत आणि महिला सदस्यांनाही ते ठिकाण रुचणार नसून ते खर्चिकही असल्याचे सांगून महापौरांनी गोव्यावर फुली मारली. त्यानंतर, आता महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी हे शिबिर घेण्याचे ठरले असून पुढील आठवड्यात दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील यशदा, अंधेरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या प्रख्यात संस्था असताना ठाण्यातील नगरसेवकांना महाबळेश्वरचा मोह कशाला झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही केवळ महाबळेश्वरची पावसाळी सहल ठरेल, अशी टीका आता होऊ लागली आहे. आतापर्यंत जे अभ्यासदौरे झाले, त्यांचे इतिवृत्त आतापर्यंत कधीच पटलावर ठेवलेले नाही, हे विशेष.