शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

येत्या ४८ तासात ठाणे बॅनरमुक्त करा!

By admin | Updated: September 19, 2016 03:25 IST

महापालिकेची परवानगी घेतली नसेल, त्या मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.

ठाणे : गणेशोत्सवात शहराच्या विविध भागात लावलेले जाहिरात फलक ४८ तासांमध्ये काढण्याच्या सूचना देत, ज्या मंडळांनी मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी घेतली नसेल, त्या मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. विनापरवानगी फलके लावणाऱ्या मंडळांना नोटीस बजावून दंड वसूल करण्यासही सांगितले आहे.रविवारी महापालिका आयुक्तांनी विविध कामांचा आढावा घेण्यासाठी सकाळी सर्व अधिकाऱ्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक महापालिका मुख्यालयामध्ये आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता शहराच्या विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले होते. हे फलक तातडीने काढण्याची कारवाई करतानाच सबंधित मंडळांना नोटीस देऊन दंडाची रक्कम वसूल करावी, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. ठाणे महानगरपालिकेच्या बस स्टॉपवर लावण्यात येणारे वाढदिवस किंवा शुभेच्छांचे जाहिरात फलक यापुढे महापालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लावले जाणार नाहीत याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.