शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ठामपाच्या स्थायीत खडाजंगी

By admin | Updated: August 4, 2016 02:47 IST

शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते

ठाणे : शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. बांधकाम व्यावसायिकांनी तेथील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी केला. परंतु, पालिकेने याचे खापर एमएसआरडीसीवर तर एमएसआरडीसीने पालिकेवर फोडले. मात्र, या यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना करणार, हे एमएसआरडीसीने लेखी स्वरूपात पालिकेला न सांगितल्यास टोल बंद केला जाईल, असा इशारा स्थायी समिती सदस्यांनी दिला. त्यावर, पाण्याचे प्रवाह बुजवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी दिले. मुसळधार पावसामुळे रविवारी हिरानंदानी इस्टेट व आनंदनगर परिसरात पाण्याचे तळे साचले होते, असा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकाराबद्दल प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर, उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी पाणी साचल्याची वस्तुस्थिती मान्य करताना पालिका प्रशासनानेही चोख भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले. घोडबंदर रोड तयार करताना बांधलेले कलव्हर्ट हे लहान असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात २०१२ मध्ये एमएसआरडीसीला पत्रही दिले आहे, असे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. एमएसआरडीसीने ‘आयआरबी’ कंपनीला घोडबंदर रोडचे काम दिले होते. कंपनीने काम करताना या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. याचा त्रास मात्र नागरिकांना झाला आहे. त्यामुळे काय उपाययोजना करणार आहे, हे एमएसआरडीसीने महिनाभरात लेखी स्वरूपात महापालिकेला न कळवल्यास टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मुल्ला यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना पत्र देण्याची मागणी करून तशा प्रकारचा ठराव बैठकीत करण्यात आला. दुसरीकडे एमएसआरडीसीने पालिका प्रशासनाचे मुद्दे खोदून काढले आहेत. २००७ मध्ये घोडबंदर रोड बांधल्यानंतर एवढ्या वर्षात कधीच पाणी साचले नाही. पालिकेने सर्व्हिस रोडचे काम करताना मोठे कलव्हर्ट बांधले आहेत. त्यामुळे योग्य समन्वय झाला नाही. महापालिकेने पत्र दिल्यानंतर या कामासाठी निधीची तरतूद करावी लागेल, असे कळवले होते. त्यामुळे महापालिकेने हे काम केले तरी चालेल, असे लेखी उत्तर पालिकेच्या पत्राला दिले होते. मात्र, त्यांच्याकडून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सहा महिन्यांत कोणतेही काम करणे शक्य नाही, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. >निधी मिळाल्यास काम : एमएसआरडीसीभिवंडीफाटा ते घोडबंदर जंक्शनपर्यंत ३२ कलव्हर्ट आहेत. त्यातील १६ ते १७ कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्यात आले आहे. उर्वरित कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्याचे प्रस्तावित आहे. निधी उपलब्ध झाल्यास ते केले जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी खाडीजवळील नाल्यामध्ये घुसू नये तसेच नाल्यातील पाणी खाडीमध्ये जाण्यासाठी शहरात १० ठिकाणी टायडल गेट बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, हे कामही रखडले आहे, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला.टायडल गेटबरोबर पम्पिंग स्टेशनही बांधणे गरजेचे आहे. यासाठी निधीची तरतूद केली नव्हती, असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हे काम करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आली.