शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

ठाकूरबुवा समाधी परिसर गंधाळला

By admin | Updated: July 2, 2017 04:07 IST

आषाढ शुद्ध अष्टमीच्या मुहूर्तावर माउलींच्या अश्वाने शनिवारी सकाळी तिसरे गोल रिंगण पूर्ण केले. रिंगण सोहळ्याने हा परिसरच

गोपालकृष्ण मांडवकर/लोकमत न्यूज नेटवर्कतोंडले बोंडले (जि. सोलापूर) : आषाढ शुद्ध अष्टमीच्या मुहूर्तावर माउलींच्या अश्वाने शनिवारी सकाळी तिसरे गोल रिंगण पूर्ण केले. रिंगण सोहळ्याने हा परिसरच भाविकतेच्या सुवासाने जणू गंधाळून गेला.वारकऱ्यांचे टाळ-मृदंग टिपेला पोहोचले होते. बेफामपणे नाचणारी वारकऱ्यांची माउली रिंगणस्थळाजवळ स्थिरावली. झेंडेधारी, त्यापाठोपाठ अब्दागिरी घेतलेले मानकरी प्रवेशले. त्यापाठोपाठ जयघोषात माउलीची पालखी निघाली. गोल प्रदक्षिणा घालून माउली सजविलेल्या आसनावर विराजमान झाली, रिंगणमार्गावर आळंदीतील राजश्री जुन्नरकर यांनी सुरेख रांगोळ्या घातल्या.परंपरेनुसार माउलीच्या रथापुढे चालणाऱ्या भोपळे दिंडी क्रमांक १४ च्या जरीपटक्याचे निशाण उंच धरून गोल रिंगण घातले. त्यानंतर स्वाराच्या अश्वाने दौड घेतली. ही दौड अर्ध्यावर आली असतानाच माउलीचा अश्व चौखूर उधळला. पुढे निघाला. अश्वाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या. ‘माउली...माउली...’ असा अखंड गजर, हरिनाम, टाळ्या यामुळे वातावरण नादमय झाले.माउली विराजमान असलेल्या अश्वाच्या टाचांनी पुनित झालेली माती लक्षावधी भाविकांच्या माथ्यावर चढली. रंगले उडीचे खेळरिंगण पूर्ण होताच चोपदारांना सर्व दिंडीप्रमुखांना उडीच्या खेळासाठी पाचारण केले. एवढे अंतर पायी चालून जणू नवी ऊर्जा अंगी साठवून घेण्यासाठी सर्व दिंड्या माउलीच्या पालखीभोवती शिस्तीने रिंगण लावून बसल्या. चोपदारांच्या सूचनेवरून टाळकरी आणि मृदंगाचा ताल सुरू झाला. त्यात विणावादनाच्या तारा झंकारल्या. मुखात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अखंड गजर सुरू झाला. संपूर्ण वातावरणच भक्तीरसात न्हाऊन निघाले. सुमारे अर्धा तास उडीचा खेळ चालला. वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आलीबाळासाहेब बोचरे/लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एक गाऊ विठू तुझे नावआणिकाचे काम नाहीआषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या पांडुरंगाला कधी एकदा भेटेन या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हरिनामाचा जयघोष करत विविध संत आणि सज्जनांच्या पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेने निघालेली वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आली आहे. सुमारे पाच लाखांचा वैष्णवांचा दळभार पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे. आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माउली, देहूहून आलेली जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी यांच्यासमवेत सुमारे चार लाख वारकरी असून या दोन्ही पालख्यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. माउली भंडीशेगाव येथे तर तुकाराम महाराजांची पालखी वाडीकुरोली येथे मुक्कामी गेली. याच मार्गाने संत सोपानदेवही पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासमवेत १५ हजार वारकरी आहेत. त्याचबरोबर संताजी महाराज जगनाडे, बालयोगी, चौरंगीनाथ, संभाजी महाराज, सेना महाराज अशा विविध पालख्यांनीही याच मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर मार्गाने शनिवारी संत निवृत्तीनाथ व संत एकनाथांच्या पालख्यांनी प्रवेश केला असून करकंब येथे पालख्या मुक्कामी आल्या आहेत. सुमारे ५५ हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत. संत मुक्ताईची पालखी शनिवारी पंढरपुरात दाखल झाली आहे. संत एकनाथांच्या पालखीसाठी कौठाळी येथे चंद्रभागा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हे काम प्रशासनाने वेळेआधीच आणि चांगले केले आहे. त्यामुळे एकनाथांचा मार्ग सुकर झाला आहे. उर्वरित मार्गात असलेल्या गैरसोयीही दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. - रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले सोहळाप्रमुख, संत एकनाथ महाराज पालखी