शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

ठाकूरबुवा समाधी परिसर गंधाळला

By admin | Updated: July 2, 2017 04:07 IST

आषाढ शुद्ध अष्टमीच्या मुहूर्तावर माउलींच्या अश्वाने शनिवारी सकाळी तिसरे गोल रिंगण पूर्ण केले. रिंगण सोहळ्याने हा परिसरच

गोपालकृष्ण मांडवकर/लोकमत न्यूज नेटवर्कतोंडले बोंडले (जि. सोलापूर) : आषाढ शुद्ध अष्टमीच्या मुहूर्तावर माउलींच्या अश्वाने शनिवारी सकाळी तिसरे गोल रिंगण पूर्ण केले. रिंगण सोहळ्याने हा परिसरच भाविकतेच्या सुवासाने जणू गंधाळून गेला.वारकऱ्यांचे टाळ-मृदंग टिपेला पोहोचले होते. बेफामपणे नाचणारी वारकऱ्यांची माउली रिंगणस्थळाजवळ स्थिरावली. झेंडेधारी, त्यापाठोपाठ अब्दागिरी घेतलेले मानकरी प्रवेशले. त्यापाठोपाठ जयघोषात माउलीची पालखी निघाली. गोल प्रदक्षिणा घालून माउली सजविलेल्या आसनावर विराजमान झाली, रिंगणमार्गावर आळंदीतील राजश्री जुन्नरकर यांनी सुरेख रांगोळ्या घातल्या.परंपरेनुसार माउलीच्या रथापुढे चालणाऱ्या भोपळे दिंडी क्रमांक १४ च्या जरीपटक्याचे निशाण उंच धरून गोल रिंगण घातले. त्यानंतर स्वाराच्या अश्वाने दौड घेतली. ही दौड अर्ध्यावर आली असतानाच माउलीचा अश्व चौखूर उधळला. पुढे निघाला. अश्वाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या. ‘माउली...माउली...’ असा अखंड गजर, हरिनाम, टाळ्या यामुळे वातावरण नादमय झाले.माउली विराजमान असलेल्या अश्वाच्या टाचांनी पुनित झालेली माती लक्षावधी भाविकांच्या माथ्यावर चढली. रंगले उडीचे खेळरिंगण पूर्ण होताच चोपदारांना सर्व दिंडीप्रमुखांना उडीच्या खेळासाठी पाचारण केले. एवढे अंतर पायी चालून जणू नवी ऊर्जा अंगी साठवून घेण्यासाठी सर्व दिंड्या माउलीच्या पालखीभोवती शिस्तीने रिंगण लावून बसल्या. चोपदारांच्या सूचनेवरून टाळकरी आणि मृदंगाचा ताल सुरू झाला. त्यात विणावादनाच्या तारा झंकारल्या. मुखात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अखंड गजर सुरू झाला. संपूर्ण वातावरणच भक्तीरसात न्हाऊन निघाले. सुमारे अर्धा तास उडीचा खेळ चालला. वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आलीबाळासाहेब बोचरे/लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एक गाऊ विठू तुझे नावआणिकाचे काम नाहीआषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या पांडुरंगाला कधी एकदा भेटेन या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हरिनामाचा जयघोष करत विविध संत आणि सज्जनांच्या पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेने निघालेली वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आली आहे. सुमारे पाच लाखांचा वैष्णवांचा दळभार पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे. आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माउली, देहूहून आलेली जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी यांच्यासमवेत सुमारे चार लाख वारकरी असून या दोन्ही पालख्यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. माउली भंडीशेगाव येथे तर तुकाराम महाराजांची पालखी वाडीकुरोली येथे मुक्कामी गेली. याच मार्गाने संत सोपानदेवही पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासमवेत १५ हजार वारकरी आहेत. त्याचबरोबर संताजी महाराज जगनाडे, बालयोगी, चौरंगीनाथ, संभाजी महाराज, सेना महाराज अशा विविध पालख्यांनीही याच मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर मार्गाने शनिवारी संत निवृत्तीनाथ व संत एकनाथांच्या पालख्यांनी प्रवेश केला असून करकंब येथे पालख्या मुक्कामी आल्या आहेत. सुमारे ५५ हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत. संत मुक्ताईची पालखी शनिवारी पंढरपुरात दाखल झाली आहे. संत एकनाथांच्या पालखीसाठी कौठाळी येथे चंद्रभागा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हे काम प्रशासनाने वेळेआधीच आणि चांगले केले आहे. त्यामुळे एकनाथांचा मार्ग सुकर झाला आहे. उर्वरित मार्गात असलेल्या गैरसोयीही दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. - रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले सोहळाप्रमुख, संत एकनाथ महाराज पालखी