शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Corona Vaccination: ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 22:21 IST

महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

मुंबई – शहरात १०० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशात असा रेकॉर्ड बनवण्यात मुंबईत एक नंबरला आहे. मुंबईत ६५ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्र लसीकरणाच्या मोहिमेत देशात अग्रेसर आहे. परंतु औरंगाबादसारख्या काही जिल्ह्यात लसीकरणाचा वेग धीम्या गतीचा आहे. लसीकरणाचा वेग कमी असलेल्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जागरुकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची(Salman Khan) मदत घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे. याबाबत ठाकरे सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनाही कळवलं आहे असं राजेश टोपेंनी सांगितले.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी व्हावं

राजेश टोपे म्हणाले की, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे तर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस आहे. हे अंतर कमी केले जाऊ शकते का? यावर तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जात आहे. यात IMCR आणि रिसर्च करणाऱ्या टीमची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुढील ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार १०० टक्के लोकांचा लसीचा पहिला डोस दिला जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.

सध्या अडीच कोटी जनतेला लसीचा पहिला डोस देण्याचं बाकी आहे. लसीसाठी सक्ती कायद्यानुसार केली जाऊ शकत नाही. परंतु जनजागृती करणं गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याची मदत कशी घेतली जाईल यावर राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला घेतला जात आहे. लोकांच्या मनात लसीकरणाबाबत जे काही गैरसमज आहेत ते निराधार आहेत. एका धार्मिक व्यक्तीला लसीची गरज नाही किंवा लस त्यांच्यासाठी हिताची नाही. हा अंधविश्वास आणि अज्ञान आहे. ते दूर होणं गरजेचे आहे. त्यासाठीच जनतेला लसीकरणाबाबत जागृत करायला हवं. म्हणून सलमान खानसारख्या सुपरस्टारची मदत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Salman Khanसलमान खानCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे