शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरून गदारोळ, भाजपा-शिवसेना व काँग्रेस सदस्य आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 03:10 IST

नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करून तीन महापालिका कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नसीम खान यांनी करताच, आज विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजपा-शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विशेष प्रतिनिधी नागपूर : नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करून तीन महापालिका कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नसीम खान यांनी करताच, आज विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजपा-शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मुंबईत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना नसीम खान यांनी नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत, मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाची मागणीकेली. यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, मुंबईचे तुकडे पाडण्याचा हा डाव असून, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे सांगितले.मुंबई महापालिकेचे विभाजन आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, त्यांनी नसीम खान यांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली.त्यानंतर गदारोळ सुरू झाला. भाजपाचे सदस्य वेलमध्ये उतरले. या गोंधळात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, मुंबई महाराष्ट्रातच राहणार आहे, तिचे तुकडे करण्याचे कुणीही म्हटलेले नाही. मात्र, काही जण कारण नसतानावेगळा संदेश समाजात जावा, असा प्रयत्न करीत असल्याचे सांगत, शेलार यांच्यावर निशाणा साधला.पुणे महापालिकेचे विभाजन करावे, अशी मागणी समोर आलेली होती. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. मुंबईत तीन महापालिका असाव्यात का, हा चर्चेचा भाग आहे, असे सांगत, त्यांनी नसीम खान यांचा बचावदेखील केला. मुंबईचे तुकडे पाडण्याची कोणतीही भाषा आपण केलेली नाही. केवळ प्रशासकीय व्यवस्था, विकास कामांना गती मिळण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर तीन महापालिका असाव्यात, असे मत व्यक्त केलेले होते, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.नसीम खान यांचे मत कामकाजातून काढणार नाही-नसीम खान यांनी त्यांचे मत मांडलेले आहे. ते कामकाजातून काढले जाणार नाही, असे स्पष्ट करून, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेलार यांच्या मागणीतील हवा काढली. गदारोळात कामकाज एकदा १० मिनिटांसाठी, तर दुसºयांदा अर्ध्या तासासाठी स्थगित झाले, नंतर कामकाज सुरळीत झाले.शिवसेनेचे सुनील प्रभूयांनी मुंबईचे त्रिभाजन शिवसेना कदापिही होऊ देणार नाही, असे सुनावले.शिवसेनेचे सुभाष साबणे यांनीही मुंबईला धक्काही लागता कामा नये, असे सांगत, नसीम खान यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले. त्यामुळे गदारोळात भरच पडली.तिकडे ‘नसीम खान हाय हाय’, ‘मुंबई आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची’, अशा घोषणा भाजपा-शिवसेनेचे सदस्य देऊ लागले. काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbaiमुंबई