शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनावरून गदारोळ, भाजपा-शिवसेना व काँग्रेस सदस्य आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 03:10 IST

नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करून तीन महापालिका कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नसीम खान यांनी करताच, आज विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजपा-शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

विशेष प्रतिनिधी नागपूर : नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना चांगल्या सोईसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करून तीन महापालिका कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नसीम खान यांनी करताच, आज विधानसभेत एकच गदारोळ झाला. भाजपा-शिवसेना व काँग्रेसचे सदस्य आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मुंबईत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना नसीम खान यांनी नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत, मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाची मागणीकेली. यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, मुंबईचे तुकडे पाडण्याचा हा डाव असून, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे सांगितले.मुंबई महापालिकेचे विभाजन आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, त्यांनी नसीम खान यांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली.त्यानंतर गदारोळ सुरू झाला. भाजपाचे सदस्य वेलमध्ये उतरले. या गोंधळात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी, मुंबई महाराष्ट्रातच राहणार आहे, तिचे तुकडे करण्याचे कुणीही म्हटलेले नाही. मात्र, काही जण कारण नसतानावेगळा संदेश समाजात जावा, असा प्रयत्न करीत असल्याचे सांगत, शेलार यांच्यावर निशाणा साधला.पुणे महापालिकेचे विभाजन करावे, अशी मागणी समोर आलेली होती. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. मुंबईत तीन महापालिका असाव्यात का, हा चर्चेचा भाग आहे, असे सांगत, त्यांनी नसीम खान यांचा बचावदेखील केला. मुंबईचे तुकडे पाडण्याची कोणतीही भाषा आपण केलेली नाही. केवळ प्रशासकीय व्यवस्था, विकास कामांना गती मिळण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर तीन महापालिका असाव्यात, असे मत व्यक्त केलेले होते, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.नसीम खान यांचे मत कामकाजातून काढणार नाही-नसीम खान यांनी त्यांचे मत मांडलेले आहे. ते कामकाजातून काढले जाणार नाही, असे स्पष्ट करून, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेलार यांच्या मागणीतील हवा काढली. गदारोळात कामकाज एकदा १० मिनिटांसाठी, तर दुसºयांदा अर्ध्या तासासाठी स्थगित झाले, नंतर कामकाज सुरळीत झाले.शिवसेनेचे सुनील प्रभूयांनी मुंबईचे त्रिभाजन शिवसेना कदापिही होऊ देणार नाही, असे सुनावले.शिवसेनेचे सुभाष साबणे यांनीही मुंबईला धक्काही लागता कामा नये, असे सांगत, नसीम खान यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले. त्यामुळे गदारोळात भरच पडली.तिकडे ‘नसीम खान हाय हाय’, ‘मुंबई आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची’, अशा घोषणा भाजपा-शिवसेनेचे सदस्य देऊ लागले. काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbaiमुंबई