शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन

By admin | Updated: February 14, 2016 01:40 IST

परीक्षेत काही आठवले नाहीतर, मी नापास झालो तर, मला अभ्यासातले काहीच आठवत नाही... असे कैक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. १२वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत.

मुंबई : परीक्षेत काही आठवले नाहीतर, मी नापास झालो तर, मला अभ्यासातले काहीच आठवत नाही... असे कैक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. १२वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. पण करीयरचा तगादा लावणाऱ्या पालकांना घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती जात नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे, असे ‘टिस’च्या आयकॉलमधून सिद्ध झाले आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या मानवी पर्यावरण शाखेच्या वतीने फोनवरून ‘आयकॉल’ समुपदेशन चालते. यंदा या आयकॉल्सवर १२वीच्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात शंका आहेत. त्याहूनही अधिक पालकांची करीअर सक्ती त्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी मुले या हेल्पलाइनवर फोन करतात यावर तोडगा काढण्यासाठी आयकॉलतर्फे विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. विद्यार्थ्यांनी ताण न घेता अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी; शिवाय मनावरील करीअरचा ताण कमी कसा करावा, याचे मार्गदर्शन त्यांना करण्यात येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महिन्यागणिक ५०० ते ७५० फोन येत होते. आता ते एक हजारावर गेले आहेत आणि त्यात वाढ होत आहे, अशी माहिती आयकॉलचे समन्वयक पारस शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न : अभ्यासाची भीती, पालकांचे स्वप्न पूर्ण न करू शकण्याची भीती, अभ्यास लक्षात न राहण्याची भीती, नापास होण्याची भीती वाटते, दिलेल्या नोट्स पूर्ण वाचून होतील का?अमुक टक्के मिळायलाच हवेत, याच क्षेत्रात करीयर करायला हवे; नाहीतर भविष्य अंधारात आहे. अशी भीती घालून पालक विद्यार्थ्यांना अनेक शिकवण्या लावतात. पाल्याला काय हवे याचा विचार करीत नाहीत. - पारस शर्मा, आयकॉल समन्वयक