शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन

By admin | Updated: February 14, 2016 01:40 IST

परीक्षेत काही आठवले नाहीतर, मी नापास झालो तर, मला अभ्यासातले काहीच आठवत नाही... असे कैक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. १२वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत.

मुंबई : परीक्षेत काही आठवले नाहीतर, मी नापास झालो तर, मला अभ्यासातले काहीच आठवत नाही... असे कैक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. १२वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. पण करीयरचा तगादा लावणाऱ्या पालकांना घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती जात नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे, असे ‘टिस’च्या आयकॉलमधून सिद्ध झाले आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या मानवी पर्यावरण शाखेच्या वतीने फोनवरून ‘आयकॉल’ समुपदेशन चालते. यंदा या आयकॉल्सवर १२वीच्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात शंका आहेत. त्याहूनही अधिक पालकांची करीअर सक्ती त्यांना त्रासदायक ठरते. त्यामुळे मन शांत करण्यासाठी मुले या हेल्पलाइनवर फोन करतात यावर तोडगा काढण्यासाठी आयकॉलतर्फे विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. विद्यार्थ्यांनी ताण न घेता अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी; शिवाय मनावरील करीअरचा ताण कमी कसा करावा, याचे मार्गदर्शन त्यांना करण्यात येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महिन्यागणिक ५०० ते ७५० फोन येत होते. आता ते एक हजारावर गेले आहेत आणि त्यात वाढ होत आहे, अशी माहिती आयकॉलचे समन्वयक पारस शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न : अभ्यासाची भीती, पालकांचे स्वप्न पूर्ण न करू शकण्याची भीती, अभ्यास लक्षात न राहण्याची भीती, नापास होण्याची भीती वाटते, दिलेल्या नोट्स पूर्ण वाचून होतील का?अमुक टक्के मिळायलाच हवेत, याच क्षेत्रात करीयर करायला हवे; नाहीतर भविष्य अंधारात आहे. अशी भीती घालून पालक विद्यार्थ्यांना अनेक शिकवण्या लावतात. पाल्याला काय हवे याचा विचार करीत नाहीत. - पारस शर्मा, आयकॉल समन्वयक