शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनस खातेय दहा वर्षे गटांगळ्या

By admin | Updated: October 31, 2016 03:58 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले.

मुरलीधर भवार,

कल्याण- शहारातील गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले. दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचा करार झाला, पण दहा वर्षांनंतरही तो प्रकल्प रखडला आहे.प्रकल्प रखडण्यासाठी कंपनीला दोषी धरून पालिकेने त्यांना दर दिवशी पाच हजार रूपये दंडाची नोटीस बजावली आहे, तर कंत्राटदाराने प्रकल्प रखडण्यास पालिका जबाबदार असल्याचे खापर फोडत दंड भरण्यास नकार दिला आहे. या वादात प्रकल्प रखडल्याने आता नवा कंत्राटदार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीसाठी कल्याण हे जंक्शन असल्याने भिवंडी बायपासहून दुर्गाडी येथे येणारा रस्ता, कल्याण-मुरबाड बाह्यवळण रस्ता, कल्याण-मुरबाड- माळशेजमार्गे नगर, कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण-शीळ अशा वेगवेगळ््या रस्त्यांतील वाहतूक या शहरात एकवटते. जेएनपीटी बंदरातून शीळ-पनवेल मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होते. शिवाय एपीएमसी, स्थानिक बाजारपेठांतही ट्रक-अवजड वाहने येतात. त्यांच्यासाठी टर्मिनस व्हावे यासाठी २००५ मध्ये पालिकेने बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय घेतला. एसएम असोशिएट अ‍ॅण्ड बिल्डरची निविदा मंजूर झाली. दोन वर्षांत टर्मिनस बांधायचे आणि दहा वर्षे वापरायचे असे त्या करारात होते. ट्रक टर्मिनससाठी पालिकेने कंत्राटदाराला २८ हजार ३४० चौरस मीटरची जागा दिली होती. कंत्राटदार कंपनीने २४ महिन्यात ट्रक टर्मिनससह तेथे हॉटेल, व्यापारी गाळे, हॉस्पिटल, गोडाऊन आदी विकसीत करणे अपेक्षित होते. मात्र दहा वर्षांत ते झाले नाही. पालिकेनेही त्याकडे लक्ष दिले नाही. आता दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र पूर्वलक्ष्यी प्रभावाने दंड आकारता येत नसल्याने नोटिशीच्या तारखेपासून तो लागू होईल. >डम्पिंग हाच अडथळादिरंगाईचे खापर कंत्राटदाराने पालिकेवरच फोडले आहे. जागा उशिरा ताब्यात मिळाली, त्यामुळे कामाचे नियोजन करता आले नाही. शिवाय प्रकल्पाशेजारच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे मजूर पळून गेले, प्रकल्पासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने कोसळली, पालिकेने डम्पिंगच्या गाड्या प्रकल्पात घुसवल्या, त्यामुळे प्रकल्प मार्गी लावता आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.