शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ट्रक टर्मिनस खातेय दहा वर्षे गटांगळ्या

By admin | Updated: October 31, 2016 03:58 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले.

मुरलीधर भवार,

कल्याण- शहारातील गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधारवाडीनजीक बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले. दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचा करार झाला, पण दहा वर्षांनंतरही तो प्रकल्प रखडला आहे.प्रकल्प रखडण्यासाठी कंपनीला दोषी धरून पालिकेने त्यांना दर दिवशी पाच हजार रूपये दंडाची नोटीस बजावली आहे, तर कंत्राटदाराने प्रकल्प रखडण्यास पालिका जबाबदार असल्याचे खापर फोडत दंड भरण्यास नकार दिला आहे. या वादात प्रकल्प रखडल्याने आता नवा कंत्राटदार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहतुकीसाठी कल्याण हे जंक्शन असल्याने भिवंडी बायपासहून दुर्गाडी येथे येणारा रस्ता, कल्याण-मुरबाड बाह्यवळण रस्ता, कल्याण-मुरबाड- माळशेजमार्गे नगर, कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण-शीळ अशा वेगवेगळ््या रस्त्यांतील वाहतूक या शहरात एकवटते. जेएनपीटी बंदरातून शीळ-पनवेल मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होते. शिवाय एपीएमसी, स्थानिक बाजारपेठांतही ट्रक-अवजड वाहने येतात. त्यांच्यासाठी टर्मिनस व्हावे यासाठी २००५ मध्ये पालिकेने बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर ट्रक टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय घेतला. एसएम असोशिएट अ‍ॅण्ड बिल्डरची निविदा मंजूर झाली. दोन वर्षांत टर्मिनस बांधायचे आणि दहा वर्षे वापरायचे असे त्या करारात होते. ट्रक टर्मिनससाठी पालिकेने कंत्राटदाराला २८ हजार ३४० चौरस मीटरची जागा दिली होती. कंत्राटदार कंपनीने २४ महिन्यात ट्रक टर्मिनससह तेथे हॉटेल, व्यापारी गाळे, हॉस्पिटल, गोडाऊन आदी विकसीत करणे अपेक्षित होते. मात्र दहा वर्षांत ते झाले नाही. पालिकेनेही त्याकडे लक्ष दिले नाही. आता दंडाची नोटीस पाठवली आहे. मात्र पूर्वलक्ष्यी प्रभावाने दंड आकारता येत नसल्याने नोटिशीच्या तारखेपासून तो लागू होईल. >डम्पिंग हाच अडथळादिरंगाईचे खापर कंत्राटदाराने पालिकेवरच फोडले आहे. जागा उशिरा ताब्यात मिळाली, त्यामुळे कामाचे नियोजन करता आले नाही. शिवाय प्रकल्पाशेजारच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे मजूर पळून गेले, प्रकल्पासाठी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने कोसळली, पालिकेने डम्पिंगच्या गाड्या प्रकल्पात घुसवल्या, त्यामुळे प्रकल्प मार्गी लावता आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.