शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

दहा हजार वनगुन्हे अद्यापही प्रलंबित

By admin | Updated: December 25, 2014 23:34 IST

पुरावे गोळा करण्यात अपयश : वृक्षतोड व वनअतिक्रमणाचे आव्हान.

नीलेश शहाकार / बुलडाणा:जंगलाचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा वापर करून अनेक उपक्रम सुरू केले असले, तरी वनगुन्हे निकालात काढण्याची गती वाढलेली नाही. राज्यात सध्या दहा हजार वनगुन्हे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात प्रलंबित असलेल्या वनगुन्ह्यांची संख्या सुमारे १४ हजार २४१ होती. यात २0१४ मध्ये ३१ हजार ४९८ वनगुन्ह्याची भर पडली. मात्र वर्षा अखेरपर्यत झालेल्या एकूण ४१ हजार ४४0 वनगुन्ह्यापैकी ३0 हजार ५२४ गुन्ह्याचा निकाल लावण्यात यश आले. त्यामुळे १0 हजार ९१६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहे. राज्यात २0१0-११ मध्ये एकूण ३६ हजार १९३, तर २0११-१२ या वर्षांत ३४ हजार ७७९ वनगुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड, अवैध चराई, आगी लावणे यासारख्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या जात असताना विविध कारणांमुळे गुन्हे प्रलंबित राहत असल्याची परिस्थिती आहे. जंगलात वनगुन्हे घडल्यानंतर वनरक्षक गुन्हा दाखल करीत असत आणि २४ तासांनी संबंधित वनरक्षक त्या भागातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना त्याची माहिती देत होते. उपवनसंरक्षकांपयर्ंत संपूर्ण माहिती पोहोचेपयर्ंत आठवडा लागत होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्ह्यांच्या नोंदीविषयक माहिती तत्काळ उपलब्ध होत असली तरी गुन्ह्यांचा निपटारा मात्र वेगवान होऊ शकला नाही.वृक्षतोड व अतिक्रमणाचे गुन्हे जास्तगडचिरोली,अमरावती,औरंगाबाद,ठाणे,पुणे वनक्षेत्रात वनगुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वनगुन्ह्यांच्या बाबतीत वृक्षतोडी आणि वनजमिनीवरील अतिक्रमण गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. या प्रकरणांमध्ये साक्षीदारांपासून ते सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी लागणार्‍या मोठय़ा कालावधीमुळे गुन्हे प्रलंबित राहतात. जंगलात होणारी अवैध चराई रोखणे, वृक्षतोडीला आळा घालणे ही मोठी आव्हाने सध्या वनविभागासमोर आहेत.