शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

दहा हजार वनगुन्हे अद्यापही प्रलंबित

By admin | Updated: December 25, 2014 23:34 IST

पुरावे गोळा करण्यात अपयश : वृक्षतोड व वनअतिक्रमणाचे आव्हान.

नीलेश शहाकार / बुलडाणा:जंगलाचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा वापर करून अनेक उपक्रम सुरू केले असले, तरी वनगुन्हे निकालात काढण्याची गती वाढलेली नाही. राज्यात सध्या दहा हजार वनगुन्हे प्रलंबित असल्याचे वास्तव समोर आले आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात प्रलंबित असलेल्या वनगुन्ह्यांची संख्या सुमारे १४ हजार २४१ होती. यात २0१४ मध्ये ३१ हजार ४९८ वनगुन्ह्याची भर पडली. मात्र वर्षा अखेरपर्यत झालेल्या एकूण ४१ हजार ४४0 वनगुन्ह्यापैकी ३0 हजार ५२४ गुन्ह्याचा निकाल लावण्यात यश आले. त्यामुळे १0 हजार ९१६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहे. राज्यात २0१0-११ मध्ये एकूण ३६ हजार १९३, तर २0११-१२ या वर्षांत ३४ हजार ७७९ वनगुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड, अवैध चराई, आगी लावणे यासारख्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या जात असताना विविध कारणांमुळे गुन्हे प्रलंबित राहत असल्याची परिस्थिती आहे. जंगलात वनगुन्हे घडल्यानंतर वनरक्षक गुन्हा दाखल करीत असत आणि २४ तासांनी संबंधित वनरक्षक त्या भागातील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना त्याची माहिती देत होते. उपवनसंरक्षकांपयर्ंत संपूर्ण माहिती पोहोचेपयर्ंत आठवडा लागत होता. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्ह्यांच्या नोंदीविषयक माहिती तत्काळ उपलब्ध होत असली तरी गुन्ह्यांचा निपटारा मात्र वेगवान होऊ शकला नाही.वृक्षतोड व अतिक्रमणाचे गुन्हे जास्तगडचिरोली,अमरावती,औरंगाबाद,ठाणे,पुणे वनक्षेत्रात वनगुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. वनगुन्ह्यांच्या बाबतीत वृक्षतोडी आणि वनजमिनीवरील अतिक्रमण गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. या प्रकरणांमध्ये साक्षीदारांपासून ते सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी लागणार्‍या मोठय़ा कालावधीमुळे गुन्हे प्रलंबित राहतात. जंगलात होणारी अवैध चराई रोखणे, वृक्षतोडीला आळा घालणे ही मोठी आव्हाने सध्या वनविभागासमोर आहेत.