शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दस-याला शिवसेनेचा सत्तात्याग?, फडणवीस सरकारवर मात्र परिणामाची शक्यता धूसरच

By यदू जोशी | Updated: September 21, 2017 11:26 IST

शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे.

मुंबई : शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदारांची दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर, काही नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यातही सरकारमधून बाहेर पडण्याचाच मूड होता. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.खा. गजानन कीर्तिकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी मंत्री लीलाधर डाके, खा. संजय राऊत या वेळी उपस्थित होते, असे समजते.सरकारमधून बाहेर पडा, असा सेनेच्या बहुतांशी आमदारांचा आग्रह आहे. आताच निर्णय घेतल्यास, सरकारविरोधी वातावरण अधिक पेटविता येईल, त्याचा निवडणुकीत फायदा होईल. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा, तो आताच घ्या, असे नेत्यांनी व आमदारांनी उद्धव यांना स्पष्टपणे सांगितले. आमदारांची मते व भाजपासोबतची फरफट थांबविण्यासाठी इच्छा बघता, सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेण्याच्या निर्णयापर्यंत उद्धव आले असल्याचे संकेत आहेत. पेट्रोल दरवाढ, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गावरूनही उद्धव हे त्या वेळी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करतील, असे मानले जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढला, तरी सरकार कोसळण्याची शक्यता नसून, १२२ आमदारांच्या साह्याने फडणवीस बहुमत सिद्ध करू शकतील. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले, तरच नवे सरकार बनेल, पण तशी शक्यता नाही. पाठिंबा काढल्यानंतर इतरांबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा शिवसेनेचा विचार नाही. विरोधी पक्षात राहून निवडणुकीला सामोरे गेल्यास फायदा होईल, असा प्रवाह सेनेत आहे.>निवडणूक नको असल्याने सरकार तरेलबहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ लागेल, म्हणजे भाजपाला २३ आमदारांची गरज भासेल. तथापि, काँग्रेस, राष्ट्रवादी वा शिवसेनेपैकी कोणालाच आता निवडणूक नको असल्याने, कोणीही आताच सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा स्थितीत उपस्थित सदस्य संख्येच्या निम्म्याहून एक जास्त सदस्य असला, तरी सरकार टिकेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे आता राणे गुरुवारी काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.>शिवसेनेची साथ घेतल्यास काँग्रेसला मुस्लिमांची मते गमवावी लागू शकतात. त्यामुळे भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकत्र येणारच नाहीत, याचा अंदाज असल्यानेच, ‘त्यांनी अल्टिमेटम दिलेला असला, तरी ‘अल्टिमेट’ आम्हीच आहोत,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने बोलून दाखवित आहेत, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.> पक्षीय बलाबलभाजपा १२२शिवसेना ६३काँग्रेस ४२राष्ट्रवादी ४१बविआ ०३शेकाप ०३एमआयएम ०२अपक्ष ०७(भारिपा, माकपा, मनसे,रासपा, सपा प्रत्येकी एक)

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस