शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

दस-याला शिवसेनेचा सत्तात्याग?, फडणवीस सरकारवर मात्र परिणामाची शक्यता धूसरच

By यदू जोशी | Updated: September 21, 2017 11:26 IST

शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे.

मुंबई : शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदारांची दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर, काही नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यातही सरकारमधून बाहेर पडण्याचाच मूड होता. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.खा. गजानन कीर्तिकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी मंत्री लीलाधर डाके, खा. संजय राऊत या वेळी उपस्थित होते, असे समजते.सरकारमधून बाहेर पडा, असा सेनेच्या बहुतांशी आमदारांचा आग्रह आहे. आताच निर्णय घेतल्यास, सरकारविरोधी वातावरण अधिक पेटविता येईल, त्याचा निवडणुकीत फायदा होईल. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा, तो आताच घ्या, असे नेत्यांनी व आमदारांनी उद्धव यांना स्पष्टपणे सांगितले. आमदारांची मते व भाजपासोबतची फरफट थांबविण्यासाठी इच्छा बघता, सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेण्याच्या निर्णयापर्यंत उद्धव आले असल्याचे संकेत आहेत. पेट्रोल दरवाढ, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गावरूनही उद्धव हे त्या वेळी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करतील, असे मानले जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढला, तरी सरकार कोसळण्याची शक्यता नसून, १२२ आमदारांच्या साह्याने फडणवीस बहुमत सिद्ध करू शकतील. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले, तरच नवे सरकार बनेल, पण तशी शक्यता नाही. पाठिंबा काढल्यानंतर इतरांबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा शिवसेनेचा विचार नाही. विरोधी पक्षात राहून निवडणुकीला सामोरे गेल्यास फायदा होईल, असा प्रवाह सेनेत आहे.>निवडणूक नको असल्याने सरकार तरेलबहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ लागेल, म्हणजे भाजपाला २३ आमदारांची गरज भासेल. तथापि, काँग्रेस, राष्ट्रवादी वा शिवसेनेपैकी कोणालाच आता निवडणूक नको असल्याने, कोणीही आताच सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा स्थितीत उपस्थित सदस्य संख्येच्या निम्म्याहून एक जास्त सदस्य असला, तरी सरकार टिकेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे आता राणे गुरुवारी काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.>शिवसेनेची साथ घेतल्यास काँग्रेसला मुस्लिमांची मते गमवावी लागू शकतात. त्यामुळे भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकत्र येणारच नाहीत, याचा अंदाज असल्यानेच, ‘त्यांनी अल्टिमेटम दिलेला असला, तरी ‘अल्टिमेट’ आम्हीच आहोत,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने बोलून दाखवित आहेत, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.> पक्षीय बलाबलभाजपा १२२शिवसेना ६३काँग्रेस ४२राष्ट्रवादी ४१बविआ ०३शेकाप ०३एमआयएम ०२अपक्ष ०७(भारिपा, माकपा, मनसे,रासपा, सपा प्रत्येकी एक)

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस