शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दहा फरार पोलीस शरण

By admin | Updated: December 28, 2016 01:13 IST

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव खून प्रकरणातील १० फरार पोलीस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले.

कऱ्हाड (जि. सातारा) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव खून प्रकरणातील १० फरार पोलीस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले. राज्य गुप्तचर विभागाने अटक करुन न्यायालयापुढे उभे केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.हणमंत लिंगाप्पा काकंडकी, दिलीप मारुती क्षीरसागर, सुधीर सुभाष जाधव, राजकुमार भीमाशंकर कोळी, अतुल संपतराव देशमुख, नितीन चंद्रकांत कदम, सुमीत विजय मोहिते, शरद सोमाजी माने, संजय मानाजी काटे, अमोल अर्जुन पवार अशी त्यांची नावे आहेत.खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे २०१६ मध्ये कऱ्हाडात घडली होती. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तपास अधिकारी होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा पोलिसांनी संशयित रावसाहेब जाधवसह त्याचा मेहुणाअनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडात आणले. १८ जून रोजी तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलीस कार्वेनाका चौकीत गेले होते. त्याठिकाणी प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचदिवशी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. रावसाहेबचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळा येथील शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला. अखेर पोलिस अधीक्षकांनी निरीक्षक धस यांच्यासह १२ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित केले. तेव्हापासूनसर्व आरोपी फरार होते. (प्रतिनिधी) दीड तास युक्तिवादसहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलीस स्वतंत्रपणे न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. तेथून सर्वजण एकत्रित प्रथम वर्ग न्यायाधीशांसमोर हजर झाले. त्यानंतर सुमारे दीड तास सरकार पक्षासह बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता.