शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

मंदिरांना अतिरेक्यांचा धोका?

By admin | Updated: May 19, 2016 03:26 IST

डोंबिवलीतील गणेश मंदिर, स्वामी नारायण मंदिर आणि शहाडचे बिर्ला मंदिर उडवून देण्याची धमकी आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने या तिन्ही मंदिरांची पाहणी केली.

डोंबिवली : डोंबिवलीतील गणेश मंदिर, स्वामी नारायण मंदिर आणि शहाडचे बिर्ला मंदिर उडवून देण्याची धमकी आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने या तिन्ही मंदिरांची पाहणी केली. श्वानपथकांच्या मदतीने संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला. मंदिरांमध्ये अचानक तपासणी मोहीम सुरू झाल्याने भाविकांत एकच खळबळ उडाली. मंदिरांना धमकी आली नसली, तरी दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्याकडील माहितीनुसार ही तपासणी केली आणि सुरूवातीला त्याची कल्पना स्थानिक पोलिसांनाही नव्हती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तपासणी करीत आहोत, एवढे मोघम उत्तर तपासणी करणाऱ्यांनी मंदिर प्रशासनांना दिले. डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिर परिसरात बॉम्बशोधक तपासणी पथक आणि श्वान पथकाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते. अधिकारी मात्र दिवसभरात तपासणीबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हते. मंदिराच्या विश्वस्तांनी मात्र अधिकृतरित्या माहिती देण्यास नकार दिला असला तरी तपासणी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.कल्याणमधील तीन तरूण ‘इसीस’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांचा म्होरक्या मुंब्य्रातून काम करत असल्याचे गेल्यावर्षी उघड झाले होते. त्या आधारे सतत सुरू असलेल्या माहितीच्या आदान-प्रदानातून दहशवादविरोधी पथकाला जी गुप्त माहिती मिळाली, त्यानुसारच त्यांनी ही तपासणी करून सुरक्षेबाबत मंदिर प्रशासनांना काही सूचनाही केल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील काही प्रसिद्ध मंदिरे उडवून देण्याची धमकी आली आहे का, असे विचारता पोलिसांनी त्याबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मात्र मंदिरांना सुरक्षा कडेकोट करण्याच्या सूचना दिल्याचे मान्य केले. (प्रतिनिधी)मंदिरांबाहेर वाहने उभी करण्यास मनाई>गणेश मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले, की मंदिरांत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून गरज पडल्यास ही सुरक्षा यंत्रणा अधिक चोख केली जाईल. मंदिरांबाहेर कोणतीही वाहने उभी करण्यास सक्त मनाई केली असून गरज पडल्यास फेरीवाल्यांनाही तेथून हटवण्याचा विचार सुरु आहे.त्याबाबत पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्यास पालिकेच्या मदतीने हा निर्णय अंमलात आणला जाईल. अनोळखी व्यक्तींवर कडक नजर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.