शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात तेलंगणचा सव्र्हे

By admin | Updated: August 22, 2014 14:30 IST

17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली.

शंकर चव्हाण - जीवती (जि़ चंद्रपूर)
महाराष्ट्र आणि आंध्रच्या सीमावादात अडकलेली जीवती तालुक्यातील 14 गावे महाराष्ट्राचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 17 जुलै 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंध्र शासनाने आपली विकास यंत्रणा या गावांमध्ये चालूच ठेवली. आता नवनिर्मित तेलंगणा राज्याने या सीमेवरील गावात जनगणना व आर्थिक सव्र्हेक्षण सुरू केले आहे.
महाराष्ट्रातील परमडोली, तांडा, मुकादमगुडा, कोढा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, येसापूर, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावांत तेलगंणने जनगणना व आर्थिक पाहणी सुरू केली आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार 1956च्या फाजल अली समितीने निर्धारित केलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार ही 14 गावे महाराष्ट्रातीलच आहेत. या सर्व गावांत मराठी भाषक राहतात. सर्वोच्च न्यायालयानेही मराठी भाषकांना न्याय दिला आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाने या गावांतील विकासकामांकडे दुर्लक्ष केले. याचाच फायदा आंध्र शासनाने घेतला आणि आता तेलंगणा राज्यानेसुद्धा आपला ताबा कायम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
आजही या गावातील रहिवाशांची नावे आदिलाबाद  लोकसभा क्षेत्र व आसिफाबाद विधानसभा क्षेत्रच्या याद्यांमध्ये आहेत. रहिवासी निवडणुकीत दोन्ही राज्यांत मतदान करतात.  
 
> आंध्र सरकारने या गावांमध्ये वीजपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, रोजगार हमी योजनेची कामे केली आहेत. एवढेच नव्हे, तर तेलगू भाषक शाळाही उघडल्या आहेत. 
> भीषण पाणीटंचाई बघता केंद्र शासनाच्या भारत निर्माण योजनेंतर्गत मोटार विद्युत पंप व हातपंपांची सोय करून आंध्र सरकारने ग्रामस्थांची तहान भागविली आहे. 
> महाराष्ट्र शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प व महाजल प्रकल्प योजना या दोन्ही योजना निकामी ठरल्या आहेत. या योजना नावाला सुरू करण्यात आल्या. यात अनेकांनी मलिदा लाटून काम अर्धवट ठेवल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. 
> लेंडीगुडा, महाराजगुडा, परमडोली या गावांत आंध्र आणि महाराष्ट्र सरकारने रस्ते तयार केले आहेत. आंध्रच्या रस्त्यावरील डांबरीकरण शाबूत असून, महाराष्ट्राचा रस्ता बांधल्यानंतर काही दिवसांतच उखडला आहे.