शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सूर्य पाहिलेल्या माणसाचा 'अस्त'; लागू यांच्या निधनानंतर नाट्यकर्मींच्या डोळ्यांत तरळले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:54 IST

लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकारी नाट्यकर्मींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

पुणे : ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला धक्का बसला.

लागू यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकारी नाट्यकर्मींच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने अभिनयाची शाळाच काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांनी अभिनयाचा वस्तुपाठ आणि रंगभूमीचे व्याकरणच प्रत्यक्षात आणले. आपण केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक रंगभूमीवरचा एक मोठा नट गमावला आहे. परदेशी नाट्यकर्मींच्या तोडीस तोड असा त्यांचा अभिनय होता. शंभूमित्रा, उत्पल दत्त आणि आता लागू हे त्रिकुट काळाआड गेले आहे, अशी प्रतिक्रिया सतीश आळेकर यांनी दिली. 

 लागू हे विचारवंत आणि अभ्यासू नट होते. त्यांनी कायम अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली. आणीबाणीच्या काळात ठामपणे आपली भूमिका मांडली. 'एक होती राणी' हे नाटक रंगभूमीवर आणले. विजय तेंडुलकर, तसेच आम्हा कलाकारांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले. त्यांचा अभिनय खूप प्रगल्भ आणि कलाकारांना खूप काही शिकवणारा असायचा. त्यांचे 'सॉक्रेटिस' चे 20 मिनिटांचे स्वगत ज्यांनी ऐकले असेल, त्यांचे आयुष्य सार्थकी लागले असे मला वाटते. गणपतराव जोशी यांच्याप्रमाणे लागू यांच्या अभिनयाच्या, माणुसकीच्या छटा कायम मनावर अधिराज्य करतील, असेही आळेकर म्हणाले. 

तर अतुल पेठे यांनी रंगभूमी पोरकी झाल्याचे म्हटले. मी डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयी इतके लिहिले आहे की त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सुन्न झालो आहे. या शोकमग्न अवस्थेत काहीच बोलणे शक्य नाही, अशा भावन त्यांनी व्यक्त केल्या. 

डॉ. श्रीराम लागू यांना महाराष्ट्राने नटसम्राट ही उपाधी दिली. लागू यांच्या कारकिर्दीची सुरुवात हौशी, प्रायोगिक रंगमंचावरून झाली. मात्र, व्यावसायिक रंगभूमीसाठी आवश्यक असणारी शिस्त, कामातील सफाईदारपणा त्यांनी प्रायोगिक रंगभूमीपासूनच अंगी बाणवला. ते अतिशय बुद्धिमान नट आणि तेवढेच संवेदनशील माणूस होते. त्यांचे वाचन अफाट आणि विश्लेषण करण्याची क्षमता विलक्षण होती. जे वाटते ते बोलण्याचे आणि प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय त्यांनी दाखवले. त्यांचे वागण्या- बोलण्यातील आणि विचारांमधील वेगळेपण कायम अधोरेखित व्हायचे. यश, अथवा लोकप्रियता कलाकाराला मिळतेच. मात्र, त्यांना यशाबरोबरच प्रतिष्ठाही मिळाली. असे नट अगदी विरळच. डॉ. लागू यांचे 'लमाण' हे आत्मचरित्र अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या तन्वीर सन्मान पुरस्कारादरम्यान नसिरुद्दीन शाह यांनीही आवर्जून 'लमाण' चा उल्लेख केला. डॉ. लागू यांनी सामाजिक भान जपत सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला. त्यासाठी 'लग्नाची बेडी' सारखे नाटकाचे प्रयोग केले. त्यांच्याविषयीच्या आठवणींचा पट खूप मोठा आहे, अशा आठवणी माधव वझे यांनी सांगितल्या.

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागू