शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:26 IST

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे ...

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली. आरोप करणाऱ्या  राहुल गांधींना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली.नागपुरात ग्रंथालय भारतीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी संघाची भूमिका मांडली. समाजाला संघटित करण्यासाठी संघ काम करतो. संघ प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्याात सहभागी झाला नाही, मात्र संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते. अगदी महात्मा गांधींच्या जंगल सत्याग्रहात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील १९३० साली सहभागी झाले होते. मात्र असे करीत असताना त्यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. परांजपे यांच्याकडे दिली होती. अनेक स्वयंसेवकांना फाशीदेखील झाली होती. मात्र राहुल गांधी हे त्यांना माहीत असलेला इतिहास सांगत आहेत. त्यांना संघदेखील माहीत नाही. तो जे इतिहास जाणतात त्याचा ह्यप्रपोगंडाह्ण करीत आहेत. संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. संघ आपले काम करीत राहील. प्रत्यक्षात ही चर्चाच योग्य नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी त्यांनी  खरा भारत नाकारला२०१४ पूर्वी देशात पुरोगामित्वाच्या नावाखाली खरा भारत व त्याची संस्कृतीच नाकारण्यात आली. आपण जे आहोत, ते आम्ही नाहीत हे सांगण्याची स्पर्धा होत होती. यात काही विदेशी संस्था व देशातीलच विचारधारा सहभागी होत्या. मात्र भारताला नाकारणाऱ्यांचा जनाधार आता संपत आहे. विरोधात प्रचार होत असतानादेखील संघाची स्वीकारार्हता वाढते आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ