शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:26 IST

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे ...

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली. आरोप करणाऱ्या  राहुल गांधींना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली.नागपुरात ग्रंथालय भारतीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी संघाची भूमिका मांडली. समाजाला संघटित करण्यासाठी संघ काम करतो. संघ प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्याात सहभागी झाला नाही, मात्र संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते. अगदी महात्मा गांधींच्या जंगल सत्याग्रहात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील १९३० साली सहभागी झाले होते. मात्र असे करीत असताना त्यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. परांजपे यांच्याकडे दिली होती. अनेक स्वयंसेवकांना फाशीदेखील झाली होती. मात्र राहुल गांधी हे त्यांना माहीत असलेला इतिहास सांगत आहेत. त्यांना संघदेखील माहीत नाही. तो जे इतिहास जाणतात त्याचा ह्यप्रपोगंडाह्ण करीत आहेत. संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. संघ आपले काम करीत राहील. प्रत्यक्षात ही चर्चाच योग्य नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी त्यांनी  खरा भारत नाकारला२०१४ पूर्वी देशात पुरोगामित्वाच्या नावाखाली खरा भारत व त्याची संस्कृतीच नाकारण्यात आली. आपण जे आहोत, ते आम्ही नाहीत हे सांगण्याची स्पर्धा होत होती. यात काही विदेशी संस्था व देशातीलच विचारधारा सहभागी होत्या. मात्र भारताला नाकारणाऱ्यांचा जनाधार आता संपत आहे. विरोधात प्रचार होत असतानादेखील संघाची स्वीकारार्हता वाढते आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ