शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शालार्थ प्रणालीत नाव नसल्याने शिक्षकांचे वेतन ६ वर्षांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:04 IST

मुंबई : शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे मागील ६ वर्षांपासूनचे वेतन थकीत आहे. उपसंचालक कार्यालयाकडे ...

मुंबई : शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे मागील ६ वर्षांपासूनचे वेतन थकीत आहे. उपसंचालक कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात न आल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सहा वर्षांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकांसाठी स्थापन केलेल्या स्पेशल टास्क फोर्सची बैठक फक्त एकदाच झाली आहे. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या शालार्थमध्ये नाव नोंदणी करण्याचा व त्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सच्याच सदस्यांनी या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.शालार्थबाबतीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य एल. एस. दीक्षित यांनी दिली. या समितीमध्ये १६ सदस्यांचा समावेश आहे. याद्वारे शिक्षकांच्या नावनोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविल्या जाव्यात आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागावा हा हेतू होता. मात्र ९ मार्च रोजी पहिल्या बैठकीनंतर या टास्क फोर्सची कुठलीही बैठक घेण्यात आली नसल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. त्यामुळे या टास्क फोर्सच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.सोबतच राज्यातील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या नोंदणीचा प्रश्न सोडविला जावा या हेतूने ८ उपसंचालक कार्यालयांमध्ये या नोंदणी करून घेतल्या जाव्यात अशी सूचनाही टास्क फोर्सच्या समितीतील सदस्यांनी केली होती. मात्र शिक्षण विभागाकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. परिणामी, राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मागील ६ वर्षांपासून विनावेतन काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध आणि शिक्षकांना त्यांचे वेतन मिळवून देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. यापुढे शालार्थ प्रणालीचा फटका बसलेल्या शिक्षकांना वेतन मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.