शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शिक्षक परिषदेचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: September 15, 2015 02:46 IST

राज्य शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या संच निर्धारणाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संचमान्यतेबाबत शासनाने

मुंबई : राज्य शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या संच निर्धारणाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संचमान्यतेबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाने ६ ते १४ वयोगटातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवणार असल्याचा आरोप परिषदेने केला आहे.संचमान्यता २०१३-१४ व २०१४-१५ रद्द करून त्याऐवजी २०१२-१३ची संचमान्यता पायाभूत मानण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. एका वर्गातील विद्यार्थी संख्या २० ग्राह्य धरून पूर्वीप्रमाणेच वर्गनिहाय शिक्षकांची पदे भरण्याची परिषदेची मागणी आहे. ‘एक शाळा एक मुख्याध्यापक’ या संकल्पनेवर आॅक्टोबर २०१५ पूर्वी संचमान्यता लागू करावे, अशा मागणीचे निवेदनही परिषदेने शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.प्रत्यक्षात संचमान्यतेसाठी बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहू नयेत म्हणून शिक्षक परिषदेतील तज्ज्ञांची शासन समितीवर नेमणूक करण्याची मागणीही परिषदेने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयाने ३० ते ४० हजार पदे कमी होण्याची शक्यता परिषदेने व्यक्त केली. परिणामी, तितक्याच शिक्षकांना शासननिर्णयाचा फटका बसणार असल्याचा आरोप परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)संचमान्यता म्हणजे ?- संचमान्यता हे विद्यार्थ्यांमागील शिक्षकांचे प्रमाण ठरवण्याचे सॉफ्टवेअर आहे. - शासनाच्या नव्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, तर सहावी ते आठवीपर्यंत ३५ विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक निश्चित करण्यात येणार आहे.- परिणामी, हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून, किमान २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक निश्चित करण्याची परिषदेची मागणी आहे.