शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शिक्षक परिषदेचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: September 15, 2015 02:46 IST

राज्य शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या संच निर्धारणाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संचमान्यतेबाबत शासनाने

मुंबई : राज्य शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या संच निर्धारणाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संचमान्यतेबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाने ६ ते १४ वयोगटातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवणार असल्याचा आरोप परिषदेने केला आहे.संचमान्यता २०१३-१४ व २०१४-१५ रद्द करून त्याऐवजी २०१२-१३ची संचमान्यता पायाभूत मानण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. एका वर्गातील विद्यार्थी संख्या २० ग्राह्य धरून पूर्वीप्रमाणेच वर्गनिहाय शिक्षकांची पदे भरण्याची परिषदेची मागणी आहे. ‘एक शाळा एक मुख्याध्यापक’ या संकल्पनेवर आॅक्टोबर २०१५ पूर्वी संचमान्यता लागू करावे, अशा मागणीचे निवेदनही परिषदेने शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.प्रत्यक्षात संचमान्यतेसाठी बनविलेल्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी राहू नयेत म्हणून शिक्षक परिषदेतील तज्ज्ञांची शासन समितीवर नेमणूक करण्याची मागणीही परिषदेने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शासनाने २८ आॅगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयाने ३० ते ४० हजार पदे कमी होण्याची शक्यता परिषदेने व्यक्त केली. परिणामी, तितक्याच शिक्षकांना शासननिर्णयाचा फटका बसणार असल्याचा आरोप परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)संचमान्यता म्हणजे ?- संचमान्यता हे विद्यार्थ्यांमागील शिक्षकांचे प्रमाण ठरवण्याचे सॉफ्टवेअर आहे. - शासनाच्या नव्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, तर सहावी ते आठवीपर्यंत ३५ विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक निश्चित करण्यात येणार आहे.- परिणामी, हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून, किमान २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक निश्चित करण्याची परिषदेची मागणी आहे.