शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शिक्षक करताहेत दडपणाखाली काम !

By admin | Updated: October 31, 2016 01:42 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर गावातील सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकत आहेत.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अनेक गावांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर गावातील सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकत आहेत. त्यामुळे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर सरपंच आणि समितीची मर्जी संभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२० शाळा असून, ९६१ शिक्षक आहेत. सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्यात अनेक आदर्श शिक्षक आहेत. परंतु सर्व शिक्षकांना गावातील कारभाऱ्यांच्या मनमानीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक पक्षांचे राजकीय कार्यकर्ते असल्यामुळे शिक्षक हा सर्वांशी हसून-खेळून राहत असतो. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसतो. परंतु गावातील विरुद्ध गटाच्या कार्यकर्त्याशी शिक्षक बोलताना दिसल्यास सरपंचाला राग अनावर होतो व तो थेट शिक्षकांना टार्गेट करतो. तुम्ही त्या पार्टीचे काम करता का, तुम्ही मला पाहून नमस्कार का केला नाही, मी गावचा सरपंच आहे. तुमची बदली करतो. तुम्ही नीट शिकवत नाही. सकाळी किती वाजता शाळेत आला, असे उलटसुलट वादग्रस्त प्रश्न शिक्षकांना विचारतात. अशा वेळी शिक्षकाला त्याची नेमकी चूक काय आहे हेही कळत नाही. त्यातच भर म्हणून शालेय व्यवस्थापन समितीदेखील सरपंचांच्याच पार्टीतील असल्यामुळे तेही पुढे येऊन शिक्षकांवर आरोप करायला सुरुवात करते. शिक्षकांवर समितीचे काही अध्यक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतात. सरांनी शालेय पोषण आहार योजनेमध्ये घोटाळा केला. मुलांना नीट जेवण दिले नाही. हजारो रुपयांचा अपहार केला असे सिद्ध न होणारे आरोप करून शिक्षकांची प्रतिमा तालुक्यात खराब करण्याचे काम काही जण करीत आहेत. यामुळे तालुक्यातील बहुतांश शिक्षक हे तालुक्याबाहेर बदली करून मागत आहे. अनेक गावांत स्थानिक राजकारणाचा फटका शिक्षकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी एका गावाच्या सरपंचांला नमस्कार घातला नाही म्हणून त्यांनी त्या गावातील शिक्षकांवर बिनबुडाचे त्यांची प्रतिमा मलीन होईल, असे आरोप केले. यानंतर आपली नोकरी जाईल या भीतीपोटी शिक्षकाने आपल्या पत्नीसह सरपंचाच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. अशा प्रकारांमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असून, असेच घडत राहिल्यास मावळातील शिक्षकांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)मावळ तालुक्यातील बहुतांश सरपंच हे निष्क्रिय असून, फक्त नामधारी आहेत. ते आपल्या पदाचा गावाच्या विकासकामासाठी वापर न करता आरोग्य सेवक, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यावर रुबाब दाखवण्यासाठी करतात. ते सरकारी नोकरांना अरेरावी करतात. अशी अरेरावी करणाऱ्या सरपंचांच्या गावामध्ये ५० टक्केदेखील अजून शौचालये नाहीत. जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आणि गाव निर्मल करण्यासाठी असे महाशय प्रयत्न करताना दिसत नाहीत. सरपंचपदाची कोणतीही कामे करत नाहीत. जबाबदाऱ्या पाळत नाहीत. पण आपण सरपंच असल्याचा रुबाब मात्र तालुकाभर फिरून दाखवतात.