शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शिक्षक करताहेत दडपणाखाली काम !

By admin | Updated: October 31, 2016 01:42 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर गावातील सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकत आहेत.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अनेक गावांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर गावातील सरपंच आणि शालेय व्यवस्थापन समिती आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकत आहेत. त्यामुळे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर सरपंच आणि समितीची मर्जी संभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२० शाळा असून, ९६१ शिक्षक आहेत. सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्यात अनेक आदर्श शिक्षक आहेत. परंतु सर्व शिक्षकांना गावातील कारभाऱ्यांच्या मनमानीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक पक्षांचे राजकीय कार्यकर्ते असल्यामुळे शिक्षक हा सर्वांशी हसून-खेळून राहत असतो. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसतो. परंतु गावातील विरुद्ध गटाच्या कार्यकर्त्याशी शिक्षक बोलताना दिसल्यास सरपंचाला राग अनावर होतो व तो थेट शिक्षकांना टार्गेट करतो. तुम्ही त्या पार्टीचे काम करता का, तुम्ही मला पाहून नमस्कार का केला नाही, मी गावचा सरपंच आहे. तुमची बदली करतो. तुम्ही नीट शिकवत नाही. सकाळी किती वाजता शाळेत आला, असे उलटसुलट वादग्रस्त प्रश्न शिक्षकांना विचारतात. अशा वेळी शिक्षकाला त्याची नेमकी चूक काय आहे हेही कळत नाही. त्यातच भर म्हणून शालेय व्यवस्थापन समितीदेखील सरपंचांच्याच पार्टीतील असल्यामुळे तेही पुढे येऊन शिक्षकांवर आरोप करायला सुरुवात करते. शिक्षकांवर समितीचे काही अध्यक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतात. सरांनी शालेय पोषण आहार योजनेमध्ये घोटाळा केला. मुलांना नीट जेवण दिले नाही. हजारो रुपयांचा अपहार केला असे सिद्ध न होणारे आरोप करून शिक्षकांची प्रतिमा तालुक्यात खराब करण्याचे काम काही जण करीत आहेत. यामुळे तालुक्यातील बहुतांश शिक्षक हे तालुक्याबाहेर बदली करून मागत आहे. अनेक गावांत स्थानिक राजकारणाचा फटका शिक्षकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी एका गावाच्या सरपंचांला नमस्कार घातला नाही म्हणून त्यांनी त्या गावातील शिक्षकांवर बिनबुडाचे त्यांची प्रतिमा मलीन होईल, असे आरोप केले. यानंतर आपली नोकरी जाईल या भीतीपोटी शिक्षकाने आपल्या पत्नीसह सरपंचाच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. अशा प्रकारांमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असून, असेच घडत राहिल्यास मावळातील शिक्षकांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)मावळ तालुक्यातील बहुतांश सरपंच हे निष्क्रिय असून, फक्त नामधारी आहेत. ते आपल्या पदाचा गावाच्या विकासकामासाठी वापर न करता आरोग्य सेवक, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यावर रुबाब दाखवण्यासाठी करतात. ते सरकारी नोकरांना अरेरावी करतात. अशी अरेरावी करणाऱ्या सरपंचांच्या गावामध्ये ५० टक्केदेखील अजून शौचालये नाहीत. जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आणि गाव निर्मल करण्यासाठी असे महाशय प्रयत्न करताना दिसत नाहीत. सरपंचपदाची कोणतीही कामे करत नाहीत. जबाबदाऱ्या पाळत नाहीत. पण आपण सरपंच असल्याचा रुबाब मात्र तालुकाभर फिरून दाखवतात.