शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या बेकायदा बडतर्फीचा भुर्दंड संस्थेनेच सोसायला हवा

By admin | Updated: February 5, 2016 04:11 IST

सरकारी अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेने त्यांच्या शाळेतील एखाद्या शिक्षकास बेकायदेशीरपणे बडतर्फ केले व पुढे ही बडतर्फी रद्द होऊन संबंधित शिक्षकास मागील सर्व पगार देण्याचा

मुंबई : सरकारी अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेने त्यांच्या शाळेतील एखाद्या शिक्षकास बेकायदेशीरपणे बडतर्फ केले व पुढे ही बडतर्फी रद्द होऊन संबंधित शिक्षकास मागील सर्व पगार देण्याचा आदेश न्यायालयाकडून दिला गेला तर अशी रक्कम देण्याची जबाबदारी सरकारवर येत नाही. त्या शिक्षकाचा बुडलेला पगार संबंधित शिक्षण संस्थेनेच चुकता करायला हवा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.भंडारा जिल्ह्यातील तुमसर एज्युकेशन सोसायटीने केलेले अपील फेटाळताना न्या. अनिल आर. दवे व न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.यामुळे या संस्थेच्या शाळेतील एक शिक्षक सुभाष मार्कंडराव पटोळे यांना निवृत्तीनंतर न्याय मिळाला आहे. मात्र पटोळे यांचा थकित पगार संस्थेनेच द्यायला हवा, असे म्हणूनही न्यायालयाने यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा ठरवून दिलेली नाही. संस्थेने पडोळे यांना सप्टेंबर २०१०मध्ये बडतर्फ केले होते. शाळा लवादाने बडतर्फी रद्द करून त्यांना मागच्या सर्व पगारासह पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला. याविरुद्ध संस्था उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेली. परंतु तेथे उभयपक्षी तडजोड झाली व संस्था पटोळे यांना पुन्हा कामावर घेण्यास राजी झाली. कालांतराने पटोळे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्या वेळी त्यांना निवृत्तीलाभ दिले गेले. मात्र थकित पगाराची रक्कम कोणी द्यायची यावरून गेली पाच वर्षे संस्थेने वाद घातला. सरकारची जबाबदारी नाहीपटोळे यांना मागचा पगार देण्यास आम्ही बांधील नाही, हे दाखविण्यासाठी संस्थेने शासनाच्या १४ मार्च १९७८च्या ‘जीआर’चा आधार घेतला. या जीआरनुसार पटोळे यांच्या बडतर्फीच्या काळात आम्ही त्यांच्या जागेवर इतर कोणाला नेमले नव्हते. एरवीही पगाराचे अनुदान सरकार देतच असल्याने पटोळे यांना बडतर्फीच्या काळाचा पगारही सरकारनेच द्यायला हवा, असे संस्थेचे म्हणणे होते. परंतु ते अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, मुळात संस्थेने पटोळे यांची बडतर्फी नियमबाह्य पद्धतीने बेकायदा केली होती. त्या निर्णयात सरकारचा सहभाग नव्हता किंवा त्यास जि.प. शिक्षणाधिकाऱ्याची मंजुरीही नव्हती. त्यामुळे हा निर्णय रद्द होण्याने पडणारा आर्थिक भुर्दंंड संस्थेनेच सोसायला हवा. तो सरकारवर टाकता येणार नाही.