शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

राज्यात तीन वर्षांत टीबीने घेतले २० हजारावर बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:12 IST

राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.राज्यात क्षयरोगाचा प्रादूर्भाव वाढत असल्यासंदर्भात पराग अळवणी व अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती. तिच्या लेखी उत्तरात क्षयरोगाने तीन वर्षांत २० हजार २१३ बळी घेतल्याची कबुली सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. २०१५ मध्ये ७६३० (त्यात मुंबई १४५९), २०१६ मध्ये ६८८४ (मुंबई १२४०) आणि २०१७ मध्ये ५६९९ (मुंबई ९६३) असे मृत्यू झाले. क्षयरोग नियंत्रणाबाबत सरकारची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, नसीम खान, सपाचे अबू आझमी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी केली. भाजपाचे डॉ.राहुल आहेर, अतुल भातखळकर, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या रोगाच्या तपासणीसाठी मुंबईत पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी तीन सुरू असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.फ्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे.मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तापसाणी करण्यात येईल. बुलढाण्याचे क्षयरोग रुग्णालय येत्या सहा महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक रूग्ण-मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरात क्षयरूग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल.