शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अंदाज, तर्कवितर्कांना उधाण

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

दोघांतच लढत : कार्यकर्त्यांमध्ये पैजा

अमित काळे -- तासगाव --अत्यंत चुरशीने झालेल्या व लक्षवेधी असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. झालेल्या मतदानावरुन बुधवारी रात्रीपासूनच राजकीय कार्यकर्त्यांत आकडेमोड सुरू झाली आहे. वाढलेला मतदार, त्याचप्रमाणे झालेले अभूतपूर्व मतदान पाहता, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना जबरदस्त यश मिळाल्यानंतर थोड्याच कालावधीनंतर झालेली ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची तसेच लक्षवेधी ठरली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. रविवार, दि. १९ रोजी मतदान यंत्रातून दोन माजी मंत्र्यांबाबत मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे.मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश असल्याने सध्या मतदानाची सुरु असणारी बेरीज, वजाबाकी तालुका पातळीवर होत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (भाजप) यांच्यातील प्रमुख लक्षवेधी लढतीत कोण कसे मतदान घेणार, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.आर. आर. पाटील हे मूळ तासगाव तालुक्यातील, तर अजितराव घोरपडे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे हेही शेंडगे घराण्यातील आहेत. एकूण झालेल्या मतदानात खास करुन धनगर समाजाच्या मतदानाबाबत विशेष चर्चा होत आहे. धनगर समाजाचे मतदान जास्त आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. शेवटपर्यंत चुरसही जाणवत होती. मतदानादिवशी सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान झाले. शहरी भागात दुपारी १२ पर्यंत सुमारे ५०-५५ टक्के मतदान झाले होते. मतदारांची उत्स्फूर्तता जाणवत होती. त्यामुळे एकूण मतदान ७७ टक्क्यापर्यंत जाऊ शकले. प्रशासनाने मतदार जागृतीत घेतलेली भूमिका, माध्यमांमधून झालेल्या आवाहनामुळेच हे मतदान झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभाविकच निकालाबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. नगरपरिषद क्षेत्रासह मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय झालेल्या मतदानावरुन बेरीज, वजाबाकीची आकडेमोड व अंदाजित टक्केवारी सध्या चर्चेत आहे. गावा-गावात चौका-चौकांमध्ये सध्या हाच विषय चर्चिला जात असल्याचे चित्र आहे. सुरुवातीस लढत चौरंगी-पंचरंगी वाटत होती. परंतु मैदान दुरंगीच झाले. आर. आर. पाटील आणि अजितराव घोरपडे या दोघांच्याचबाबतीत ही आकडेमोड सुरू आहे. कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत. वृत्तवाहिन्यांवरचे सर्व्हे, सट्टाबाजार याकडेही लक्ष आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. एकूण ७७ टक्के चुरशीने मतदान झाले. प्रशासनाची मतदार जागृतीची आग्रही भूमिका, तसेच विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या आवाहनामुळे टक्केवारी वाढली.