शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अंदाज, तर्कवितर्कांना उधाण

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

दोघांतच लढत : कार्यकर्त्यांमध्ये पैजा

अमित काळे -- तासगाव --अत्यंत चुरशीने झालेल्या व लक्षवेधी असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. झालेल्या मतदानावरुन बुधवारी रात्रीपासूनच राजकीय कार्यकर्त्यांत आकडेमोड सुरू झाली आहे. वाढलेला मतदार, त्याचप्रमाणे झालेले अभूतपूर्व मतदान पाहता, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना जबरदस्त यश मिळाल्यानंतर थोड्याच कालावधीनंतर झालेली ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची तसेच लक्षवेधी ठरली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. रविवार, दि. १९ रोजी मतदान यंत्रातून दोन माजी मंत्र्यांबाबत मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे.मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश असल्याने सध्या मतदानाची सुरु असणारी बेरीज, वजाबाकी तालुका पातळीवर होत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (भाजप) यांच्यातील प्रमुख लक्षवेधी लढतीत कोण कसे मतदान घेणार, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.आर. आर. पाटील हे मूळ तासगाव तालुक्यातील, तर अजितराव घोरपडे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे हेही शेंडगे घराण्यातील आहेत. एकूण झालेल्या मतदानात खास करुन धनगर समाजाच्या मतदानाबाबत विशेष चर्चा होत आहे. धनगर समाजाचे मतदान जास्त आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. शेवटपर्यंत चुरसही जाणवत होती. मतदानादिवशी सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान झाले. शहरी भागात दुपारी १२ पर्यंत सुमारे ५०-५५ टक्के मतदान झाले होते. मतदारांची उत्स्फूर्तता जाणवत होती. त्यामुळे एकूण मतदान ७७ टक्क्यापर्यंत जाऊ शकले. प्रशासनाने मतदार जागृतीत घेतलेली भूमिका, माध्यमांमधून झालेल्या आवाहनामुळेच हे मतदान झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभाविकच निकालाबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. नगरपरिषद क्षेत्रासह मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय झालेल्या मतदानावरुन बेरीज, वजाबाकीची आकडेमोड व अंदाजित टक्केवारी सध्या चर्चेत आहे. गावा-गावात चौका-चौकांमध्ये सध्या हाच विषय चर्चिला जात असल्याचे चित्र आहे. सुरुवातीस लढत चौरंगी-पंचरंगी वाटत होती. परंतु मैदान दुरंगीच झाले. आर. आर. पाटील आणि अजितराव घोरपडे या दोघांच्याचबाबतीत ही आकडेमोड सुरू आहे. कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत. वृत्तवाहिन्यांवरचे सर्व्हे, सट्टाबाजार याकडेही लक्ष आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. एकूण ७७ टक्के चुरशीने मतदान झाले. प्रशासनाची मतदार जागृतीची आग्रही भूमिका, तसेच विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या आवाहनामुळे टक्केवारी वाढली.