शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

तारापूर अणुभट्टी-४ दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: July 17, 2017 02:47 IST

सर्वात मोठ्या क्षमतेची १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली तारापूर येथील अणुभट्टी क्र.-४ मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, २४ मेपासून

पंकज राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : सर्वात मोठ्या क्षमतेची १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली तारापूर येथील अणुभट्टी क्र.-४ मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, २४ मेपासून ती बंद असल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. तिची तपासणी सुरू असून, लवकरच बिघाडाचे निश्चित कारण समजेल, असे उत्तर अणुऊर्जा प्रशासनाकडून देण्यात आले.२४ मे २०१७ रोजी अणुभट्टी क्र. - ४ च्या शटडाउनदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना, जड पाणी आणि किरणोत्सर्गी द्रव्याची गळती होऊन, तेथे काम करणाऱ्या कामगारांना किरणोत्सर्गाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती, परंतु बाधित कामगारांना झालेल्या किरणोत्सर्गाच्या बाधेचे प्रमाण, अणुऊर्जा नियामक मंडळा (एईआरबी)ने ठरवून दिलेल्या मापदंडकाच्या मर्यादेत असल्याचे अणुऊर्जा केंद्र प्रशासनाने सांगितले होते. त्या वेळी अणुभट्टी क्र.-४ च्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण होऊन, अणुभट्टीतून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, ५४ दिवस उलटूनही अणुभट्टी क्र.-४ मधील बिघाडासंदर्भात गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तारापूर परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. त्याच वेळी अणुभट्टी क्रमांक-३ चेही काही दिवसांपूर्वी शटडाउन घेतल्याने, ५४० मेगावॅट क्षमतेच्या दोन्ही अणुभट्ट्यांतून होणारी वीजनिर्मिती ठप्प झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.