शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
3
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
4
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
5
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
6
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
7
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
8
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
9
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
10
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
11
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
12
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
13
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
14
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
15
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
16
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
17
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
18
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
19
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
20
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

तामिळनाडूत दारुबंदीची सुरुवात, महाराष्ट्राचे काय?

By admin | Updated: May 24, 2016 03:31 IST

तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला

औरंगाबाद : तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारताच जयललिता यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी दारूची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानेही पुढील तीन वर्षांत क्रमश: दारूबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. बंग म्हणाले, जयललिता यांनी दारुबंदीची सुरूवात केली. प्रथम बिहार, मग तामिळनाडू आता महाराष्ट्र कधी, हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तामिळनाडूत दारुचा वापर व राज्य शासनाला दारुपासून मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. दारुच्या करावर पाणी सोडणे प्रत्येक राज्य शासनाला आवश्यक आहे. बिहारने ते केले. तामिळनाडूनेही त्याची सुरुवात केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने या रक्त-लांछित कराचा लोभ सोडावा. लोकांना पाणी हवे, दारु नको. म्हणून आता राज्याचे दारु धोरण बदलवून पुढील तीन वर्षांत क्रमश: दारुबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. पहिल्या वर्षात, सर्व आत्महत्याग्रस्त जिल्हे, दुष्काळग्रस्त जिल्हे व आदिवासी तालुके यामध्ये पूर्ण दारुबंदी करावी. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी उर्वरित भागातील सर्व दुकाने बंद करावीत. पण दारुबंदी केवळ पहिले पाऊल आहे. सोबतच जनजागृती, लोकसहभाग, कायदेशीर अंमलबाजवणी व व्यसनमुक्तीचा उपचार, असा चार कलमी कार्यक्रम लागू करुन उत्तरोत्तर दारुमुक्तीकडे वाटचाल करावी. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा जिल्हाव्यापी प्रयोग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच सुरू होतो आहे. महाराष्ट्र गडचिरोलीपेक्षाही मागे राहणार का, असा सवाल त्यांनी केला.दर्द जब हद से गुजर जाता है...गालिब असे म्हणाला की, ‘दर्द जब हद से गुजर जाता है, खुद दवा बन जाता है’. दारुचा रोग फार वाढल्याने भारतात सर्वत्र जनता त्यावर उपाय शोधते आहे. ती गरज ओळखून राजकारणी प्रतिसाद देत आहेत. लोकशाहीत हे होणे अपेक्षितच आहे. महाराष्ट्राचा ‘मद्यराष्ट्र’ झाल्याने व येथील जनता चाळीस हजार कोटी रुपयांची वार्षिक दारु पीत असल्याने सरकारला या रोगावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे बंग यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)