शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तामिळनाडूत दारुबंदीची सुरुवात, महाराष्ट्राचे काय?

By admin | Updated: May 24, 2016 03:31 IST

तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला

औरंगाबाद : तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारताच जयललिता यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी दारूची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानेही पुढील तीन वर्षांत क्रमश: दारूबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. बंग म्हणाले, जयललिता यांनी दारुबंदीची सुरूवात केली. प्रथम बिहार, मग तामिळनाडू आता महाराष्ट्र कधी, हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तामिळनाडूत दारुचा वापर व राज्य शासनाला दारुपासून मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. दारुच्या करावर पाणी सोडणे प्रत्येक राज्य शासनाला आवश्यक आहे. बिहारने ते केले. तामिळनाडूनेही त्याची सुरुवात केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने या रक्त-लांछित कराचा लोभ सोडावा. लोकांना पाणी हवे, दारु नको. म्हणून आता राज्याचे दारु धोरण बदलवून पुढील तीन वर्षांत क्रमश: दारुबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. पहिल्या वर्षात, सर्व आत्महत्याग्रस्त जिल्हे, दुष्काळग्रस्त जिल्हे व आदिवासी तालुके यामध्ये पूर्ण दारुबंदी करावी. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी उर्वरित भागातील सर्व दुकाने बंद करावीत. पण दारुबंदी केवळ पहिले पाऊल आहे. सोबतच जनजागृती, लोकसहभाग, कायदेशीर अंमलबाजवणी व व्यसनमुक्तीचा उपचार, असा चार कलमी कार्यक्रम लागू करुन उत्तरोत्तर दारुमुक्तीकडे वाटचाल करावी. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा जिल्हाव्यापी प्रयोग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच सुरू होतो आहे. महाराष्ट्र गडचिरोलीपेक्षाही मागे राहणार का, असा सवाल त्यांनी केला.दर्द जब हद से गुजर जाता है...गालिब असे म्हणाला की, ‘दर्द जब हद से गुजर जाता है, खुद दवा बन जाता है’. दारुचा रोग फार वाढल्याने भारतात सर्वत्र जनता त्यावर उपाय शोधते आहे. ती गरज ओळखून राजकारणी प्रतिसाद देत आहेत. लोकशाहीत हे होणे अपेक्षितच आहे. महाराष्ट्राचा ‘मद्यराष्ट्र’ झाल्याने व येथील जनता चाळीस हजार कोटी रुपयांची वार्षिक दारु पीत असल्याने सरकारला या रोगावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे बंग यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)