शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

तमाशापंढरी गजबजली

By admin | Updated: March 21, 2015 23:07 IST

गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, दिवसभरात २०० हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल आज तमाशापंढरीत झाली़, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिली़. लोकनाट्य तमाशा फडमालकांच्या दृष्टीने गुढी पाडवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुढी पाडव्याचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ येथील २९ राहुट्यांमध्ये आले होते. तमाशा ठरविताना तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गाणी किती होणार यांची प्रामुख्याने विचारणा गावपुढाऱ्यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसांसाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़ यंदा बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्याने यात्रातील रंगत कमी झाली असली तरी त्यामुळे तमाशाच्या खेळाला महत्व वाढले आहे. नारायणगावातील गर्दी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.(वार्ताहर)४गुढी पाडव्यानंतर ग्रामीण भागात यात्रांच्या हंगामाला सुरूवात होते. यात्रा म्हटली की तमाशा आलाच. तमाशा ठरविण्यासाठी गावोगावचे पुढारी गाववर्णनी काढतात. त्यानंतर नारायणगावातून येऊन तमाशाची सुपारी दिली जाते. ज्याची सुपारी मोठी त्या गावची यात्रा मोठी असे समजले जाते.४गावच्या लोकवर्गणीतून कुस्त्यांचा आखाडाही भरवला जातो. त्यामध्ये जिल्हाभरातून नामवंत पैलवान हजेरी लावतात. यंदा बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने केवळ हेच मनोरंजनाचे साधन आहे.४प्रत्येक फडमालकाला दिवसभरात ७ ते १० सुपाऱ्या मिळाल्या. या वर्षी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे तमाशा बुकिंगला फटका बसेल, असे वाटत असताना प्रत्यक्षात सर्वच फडमालकांना हे वर्ष चांगले गेले़ तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा, कालाष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़ ४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका- भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली. रघुवीर खेडकर यांची कालाष्टमी ३ लाखांना आणि पौर्णिमा २ लाख २५ हजार रुपयांना गेली. तर, त्याखालोखाल कुंदा पाटील, मालती इनामदार, अंजली नाशिककर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, जगनकुमार वेळवंडकर, विनायक महाडिक, आनंद लोकनाट्य जळगावकर, हरिभाऊ बढे नगरकर, काळू-बाळू, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, संध्या माने सोलापूरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, जगनकुमार वेळवंडकर, लता पुणेकर यांच्या सुपाऱ्या गेल्या अशी माहिती नारायणगाव लोकनाट्य तमाशा कलापंढरीचे अध्यक्ष गणपतदादा कोकणे व उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल यांनी दिली़. सव्वातीन लाखांची सुपारी४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका-भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली. ४तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते. नारायणगाव येथे तमाशा फडाच्या २९ राहुट्या आहेत़ एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाऱ्या बुक झालेल्या आहेत़ मोठ्या फडाच्या सुपाऱ्या जवळजवळ बुक झालेल्या आहेत़ सरासरी सर्व फडांचे ६० ते ७० टक्के बुकिंग झालेले आहे़ मध्यम व छोट्या फडांनादेखील या वर्षी चांगली मागणी आहे.- संभाजीराजे जाधव, अध्यक्षलोकनाट्य मराठी तमाशा परिषद