शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

तळोजा-कल्याण मेट्रो होणार

By admin | Updated: May 2, 2017 02:40 IST

मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना

ठाणे : मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे हा मार्गही मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाण्यासह संपूर्ण एमएमआर प्रदेशात क्लस्टर डेव्हलपमेंट करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्वांनी मिळून एक दिवस जरी जलयुक्त शिवारसाठी श्रमदान केले तर जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होईल आणि ठाणे जिल्ह्यात शेतीला चांगले दिवस येतील. मुंबईला लागून असलेल्या या जिल्ह्याच्या विकासाकडे आधीच्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले असले, तरी आता परिस्थिती बदलली आहे. आपला जिल्हा विविध आघाड्यांवर प्रगती करीत आहे. स्मार्ट शहराच्या यादीत आपली दोन शहरे आली आहेत. तरीही सर्वच शहरे स्मार्ट होतील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सध्या आपण फक्त भात पिकावर अवलंबून आहोत, आपल्याकडे दोन्ही हंगामात शेती झाली पाहिजे, भाजीपाला लागवडीचे क्षेत्रही वाढविले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठे, प्रगतीशील शेतकरी यांची मदत घेण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पोलीस अधीक्षक महेश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे तसेच इतर लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उघड्या जीपमधून संचलन पथकाची पाहणी केली. यावेळी विविध पोलीस दले, विद्यार्थी, तसेच विभागांच्या चित्ररथानी संचलन करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, तहसीलदार विकास पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नव्या धरणांची गरजकाही कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये १९ जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली आहेत, ही संख्या वाढविली पाहिजे. विशेषत: बंधाऱ्यांची उंची वाढवणे, गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरु स्ती करणे, अशा कामांवर भर देऊन गावे पूर्णत: टंचाईमुक्त कशी होतील याचे नियोजन आम्ही करीत आहोत. जिल्ह्यासाठी एका मोठ्या धरणाची तर आवश्यकता आहेच; परंतु दुसरीकडे पाणी वापराचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.कौशल्य विकासाचे कौतुकरोजगार आणि स्वयंरोजगार वाढविण्यासाठी देखील आपण चांगले प्रयत्न करीत आहोत. याचा उल्लेख करून पालकमंत्र्यांनी राज्यातील पहिलेच कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्धल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. च्प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्ज वाटप, हागणदारीमुक्त होण्याकडे केलेली वाटचाल, पेसा कायदा अंमलबजावणी, जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजिटल होणे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत यासारख्या चांगल्या कामगिरीबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिंदे यांचे अभिनंदन केले.