शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तळोजा-कल्याण मेट्रो होणार

By admin | Updated: May 2, 2017 02:40 IST

मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना

ठाणे : मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे हा मार्गही मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाण्यासह संपूर्ण एमएमआर प्रदेशात क्लस्टर डेव्हलपमेंट करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्वांनी मिळून एक दिवस जरी जलयुक्त शिवारसाठी श्रमदान केले तर जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होईल आणि ठाणे जिल्ह्यात शेतीला चांगले दिवस येतील. मुंबईला लागून असलेल्या या जिल्ह्याच्या विकासाकडे आधीच्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले असले, तरी आता परिस्थिती बदलली आहे. आपला जिल्हा विविध आघाड्यांवर प्रगती करीत आहे. स्मार्ट शहराच्या यादीत आपली दोन शहरे आली आहेत. तरीही सर्वच शहरे स्मार्ट होतील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सध्या आपण फक्त भात पिकावर अवलंबून आहोत, आपल्याकडे दोन्ही हंगामात शेती झाली पाहिजे, भाजीपाला लागवडीचे क्षेत्रही वाढविले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठे, प्रगतीशील शेतकरी यांची मदत घेण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पोलीस अधीक्षक महेश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे तसेच इतर लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उघड्या जीपमधून संचलन पथकाची पाहणी केली. यावेळी विविध पोलीस दले, विद्यार्थी, तसेच विभागांच्या चित्ररथानी संचलन करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, तहसीलदार विकास पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नव्या धरणांची गरजकाही कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये १९ जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली आहेत, ही संख्या वाढविली पाहिजे. विशेषत: बंधाऱ्यांची उंची वाढवणे, गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरु स्ती करणे, अशा कामांवर भर देऊन गावे पूर्णत: टंचाईमुक्त कशी होतील याचे नियोजन आम्ही करीत आहोत. जिल्ह्यासाठी एका मोठ्या धरणाची तर आवश्यकता आहेच; परंतु दुसरीकडे पाणी वापराचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.कौशल्य विकासाचे कौतुकरोजगार आणि स्वयंरोजगार वाढविण्यासाठी देखील आपण चांगले प्रयत्न करीत आहोत. याचा उल्लेख करून पालकमंत्र्यांनी राज्यातील पहिलेच कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्धल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. च्प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्ज वाटप, हागणदारीमुक्त होण्याकडे केलेली वाटचाल, पेसा कायदा अंमलबजावणी, जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजिटल होणे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत यासारख्या चांगल्या कामगिरीबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिंदे यांचे अभिनंदन केले.