शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

राजू शेट्टींशी चर्चा करूनच माझ्या मुलाला उमेदवारी - सदाभाऊ खोत

By admin | Updated: February 14, 2017 18:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 14 -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी काय टीका केली, हे मला माहीत नाही. ते माझ्या संघटनेचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधात मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी  लोकमतशी बोलताना दिली. माझा मुलगा सागर याची बागणी (ता. वाळवा) गटातील उमेदवारी खा. शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच रयत विकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.खा. शेट्टी यांनी सोमवारी सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध करत आपण तेथे प्रचाराला जाणार नसल्याचे सांगितले होते. खोत यांची घराणेशाही मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याबाबत खोत यांना विचारले असता ते म्हणाले की, वाळवा तालुक्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी बहुतांशी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन रयत विकास आघाडी केली आहे. त्यावेळी निवडून येण्याची शक्यता असलेल्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतला होता. आघाडीचे नेते आमदार शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, नानासाहेब महाडिक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बागणी परिसराचा दौरा करून सागरची उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी खा. शेट्टी यांच्याशी आघाडीच्या नेत्यांनी सागरच्या उमेदवारीबद्दल चर्चा केली होती. तरीही त्यांनी नाराजी का व्यक्त केली, असा प्रश्न मला पडला आहे.ते म्हणाले की, सागरची उमेदवारी ठरविण्याच्या प्रक्रियेत मी कोठेही नव्हतो. मला माझ्या मुलापेक्षाही कार्यकर्ते पहिल्यापासून जवळचे वाटत आले आहेत. माझ्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. माझा जन्म कष्टकऱ्यांच्या चळवळीत झाला असल्यामुळे, राजकारणापेक्षाही संघटना आणि चळवळ माझ्यादृष्टीने महत्त्वाची आहे. मी काम करीत असताना चळवळीच्या माध्यमातून काही पदे मिळाली, तर घ्यायचीच नाहीत का? चळवळीमुळे काही गावांमध्ये संघटना मजबूत झाली असेल, तर तेथे उमेदवार उभे करायला नकोत का? मुलांना राजकारणापासून दूर राहा, असे सांगायचे का? माझा मुलगा निवडणुकीसाठी उभा राहिला, यात माझी काय चूक? खासदार शेट्टी आमचे नेते आहेत. ते राजकारणातील ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही. सागरच्या उमेदवारीमुळे काही गैरसमज झाले असतील, तर त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करून ते दूर करण्यात येतील, असेही खोत यांनी स्पष्ट केले.भाजपसह मित्रपक्षांचा प्रचार करणारसत्ता की संघटना, यापैकी नेमकी कोणती निवड करायची, हा प्रश्न सध्यातरी माझ्यासमोर नाही. माझ्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे, ती आधी पूर्ण करणार आहे. भाजप सरकारचे काम चांगलेचालू असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. भाजपसह अन्य मित्रपक्षांच्या प्रचारालाही मी जाणार आहे. यासाठी मला काहीही अडचण नाही. भाजपचे नेते संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात, हा अनुभव मला तरी अजून आलेला नाही, असे स्पष्टीकरणही सदाभाऊ खोत यांनी दिले.माझा मुलगा पंढरीचा वारकरी!सागर हा शेतकरी व कष्टकरी चळवळीत काम करून पुढे आला आहे. तो पंढरीचा वारकरी असून त्याचा ग्रामीण जनतेशी चांगला संबंध आहे. येथे केवळ माझा मुलगा म्हणून जर त्याच्यावर शिक्का मारला गेला, तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. सागरच नव्हे, तर संघटनेतील कार्यकर्ताही त्याच्या गुणवत्तेवर पुढे गेला पाहिजे, अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.