शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शाहू शिक्षण क्रांती दिनी गुणवत्तेचा आढावा घ्या-- रघुनाथ माशेलकर यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:06 IST

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह ट्रस्टच्या विश्वस्तांना लिहिले पत्र---‘लोकमत’चा पाठपुरावा

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी २१ सप्टेंबर १९१७ या दिवशी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा केला होता. हा दिवस ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ म्हणून साजरा करण्याची भूमिका पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी २६ जून रोजी ‘शाहू पुरस्कार’ स्वीकारताना मांडली होती. या भूमिकेबाबत एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका सविस्तर पत्राद्वारे उपक्रम सुचविले असून, त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली.२६ जून रोजी डॉ. माशेलकर यांना येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचा शाहू पुरस्कार प्रदान केला. याच दिवशी ‘लोकमत’मध्ये शाहू महाराजांनी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक रुपये दंडचा कायदा केला होता, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत डॉ. माशेलकर राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांबाबत विस्ताराने बोलले होते. २१ सप्टेंबरला हा कायदा करून १०० वर्षे होत असल्याने हा दिवस ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन उपस्थितांना केले होते. त्यानंतर आता डॉ. माशेलकर यांनी हा दिवस कसा साजरा करता येईल, याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ट्रस्टचे विश्वस्त प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पत्रे पाठवून उपक्रम सुचविले आहेत. या दिनाच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विविध स्तरांवर सध्या दिल्या जात असलेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने कोणते बदल आवश्यक आहेत, याचा वेध घेण्यासाठी याबाबत समग्र विचारमंथन व्हावे असे वाटते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. उत्तम प्रशिक्षण झाल्याशिवाय आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य नाही. सातत्याने प्रशिक्षण दिल्याने सकारात्मक मानसिकता घडविण्यास ते उपयोगी ठरते. त्यादृष्टीने काय करता येईल, हेही पहायला हवे, असे वाटते, असे डॉ. माशेलकर यांनी पत्रात नमूद केले आहे. नवनिर्मितीचा ध्यास घेणारी मुले घडवावीतशिक्षणातील तोच तो पणा आणि ठरावीक पठडीतले अभ्यासक्रम, शिकविण्यापलीकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांनी सृजनशीलपणे, स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी त्यांच्या अंगी तशी क्षमता येण्याची गरज आहे. असा नवनिर्मितीचा ध्यास घेणारी मुलं-मुली यापुढील काळात आपल्या विविध समस्यांवर उपाय शोधून काढू शकतील. मुलांच्या सृजनशील कल्पनांना वाव देण्याच्या दृष्टीने विविध प्रश्न आणि त्याबाबत नव्या पिढीने अभ्यासपूर्वक सुचविलेल्या उपाययोजना असाही उपक्रम हाती घेता येईल, असे डॉ. माशेलकर यांनी सुचविले आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा२६ जून रोजी शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये डॉ. माशेलकर यांनी आवर्जून ‘लोकमत’चा उल्लेख केला होता. त्यानंतरही ‘लोकमत’ने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता २१ सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये ‘राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन’ आयोजित केला जावा आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, शिवाजी विद्यापीठ आणि राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने सक्रिय सहभाग घ्यावा, असेही डॉ. माशेलकर यांनी पत्रात नमूद केले आहे.