शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर साखर सार्वजनिक वितरणास घेणार - मुख्यमंत्री

By admin | Updated: January 8, 2016 02:59 IST

साखर क्षेत्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने विशेष अनुदान दिले आहे. त्यानंतरही नफेखोरीच्या अंदाजाने कारखाने ठरवून दिलेला

पुणे : साखर क्षेत्राला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने विशेष अनुदान दिले आहे. त्यानंतरही नफेखोरीच्या अंदाजाने कारखाने ठरवून दिलेला कोटा निर्यात करीत नाहीत. त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी निर्यात न केल्यास ही साखर रेग्यूलेटर प्राईसच्या माध्यमातून सार्वजनिक वितरणासाठी द्यावी लागेल, असा आवाहन वजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी साखर कारखानदारांना दिला.मांजरी येथील ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि संस्थेच्या वतीने ऊस उत्पादन आणि साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कार वितरण प्रसंगीते बोलत होते. त्यावेळी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्रीशरद पवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, साखर उद्योग गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणीत आला आहे. साखरेच्या किमतीमध्ये चढउतार होत आहे. काही ठराविक घटक जाणूनबुजून नफेखोरीसाठी हा प्रकार घडवत आहेत. कारखान्यांना निधी उभा रहावा, जागतिक बाजाराचा लाभ मिळावा, या उद्देशाने केंद्राने साखरेचा कोटा ठरवून दिला आहे. शिवाय, निर्यातीसाठी केंद्र आणि राज्य शासनानेही काही प्रमाणात अनुदान दिले आहे. मात्र, काही प्रमाणात निर्यात सुरू होताच; देशातंर्गत बाजारात साखरेची किंमत वाढण्यास सुरुवात होते आणि नफेखोरीच्या हेतूने कारखाने निर्यात बंद करतात, त्यानंतर अचानक साखरेचे दर कोसळतात आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने विक्री थांबविली जाते. अशा स्थितीत कारखाने निर्यातीबाबत गांभीर्याने विचार करणार नसतील तर, शासनालावेगळा उपाय करण्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)केवळ १३० कारखान्यांनी दिली एफआरपीचंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने साखर कारखान्यांना पॅकेज दिले आहे; तर आणखी काही कारखान्यांना सॉफ्ट लोनही देण्यात आले आहे. असे असतानाही केवळ १३० कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून, ४४ कारखान्यांनी अजूनही ३३० कोटींची रक्कम दिलेली नाही. या कारखान्यांंवर कारवाई करण्याचा सरकारचा हेतू नाही. मात्र, जास्त काळ कारवाई रोखून धरता येणार नाही, असे ते म्हणाले.शिक्षणाचा खर्च कारखान्यांनी उचलावाच्दुबळयांच्या विकासासाठीच सहकाराची निर्मिती झाली आहे. सहकाराचा हाच उद्देश नजरेसमोर ठेऊन दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा खर्च साखर कारखान्यांनी उचलावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. साखर उद्योगावर आर्थिक संकट असले तरी राज्यातील या संकटग्रस्तांना मदतीचा हात देऊन सहकाराची सामूहिक शक्ती दाखवून द्यावी, असेही पवार म्हणाले. च्पवार म्हणाले, साखरेचा हवा तेवढा उठाव होत नाही. त्यासाठी आपण जागतिक बाजारपेठेत जोमाने उतरले पाहिजे. आगामी २-३ वर्षे साखरेच्या दरासाठी चांगली राहतील असा अंदाज आहे. मात्र दुष्काळामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात साखर उत्पादन कमालीचे घटणार आहे. अशा स्थितीत कारखान्यांनी प्रशासन काटेकोरपणे व काटकसरीने चालविले पाहिजे. च्काही कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च प्रतिक्विंटलला २३०० ते २४०० क्विंटल तर काही कारखान्यांचा ३ हजार ते ३७०० रुपये असा आढळून आला आहे. ही प्रचंड तफावत असताना ते एफआरपी कशी देणार? निसर्गाच्या असहकार्यामुळे तसेच किमतीच्या चढ-उतारामुळे होणारी सहकारातील सर्व घटकांचे नुकसान सर्व सहकारी संस्थावर न टाकता राज्यशासनानेही त्यात लक्ष घालून व्यवहार्य निर्णय घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.च्वार्षिक अहवालातील साखर कारखान्यांच्या स्थितीवरून त्यांच्या कार्यप्रणालीबाबत काहीशी नाराजी व्यक्त करीत पवार यांनी कार्यपद्धतीत बदल करण्याबाबत सूचना केली.