शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

बांधलेल्या घरांचा ताबा घ्या

By admin | Updated: July 16, 2015 00:28 IST

गिरणी कामगारांसाठी बांधलेली घरे देण्यात सरकार दिरंगाई करीत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांचा आणि गिरण्यांच्या मोकळ््या जागांचा

मुंबई : गिरणी कामगारांसाठी बांधलेली घरे देण्यात सरकार दिरंगाई करीत आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांचा आणि गिरण्यांच्या मोकळ््या जागांचा कामगारांनी सहकुटुंब ताबा घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी केले.घरांच्या मागणीसाठी गेल्या आठ महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चर्चा केली नसल्याने संतप्त गिरणी कामगारांनी राणीबाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला पाठिंबा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आंदोलनाला हजेरी लावली. मैदानावर धडक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची युती सरकारने तत्काळ अंमलबजावणी करण्याची एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी या वेळी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी योग्य धोरण आखले आहेत. तसे निर्णयही झाले आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत आहे. एमएमआरडीएची घरे तयार आहेत. मात्र त्यांची लॉटरी काढण्याऐवजी सरकार नव्या जागांचा शोध घेऊन घरे बांधण्याची भाषा करीत आहे. त्यामुळे सरकारची नियत योग्य दिसत नाही. परिणामी गिरणी कामगारांनी स्वत:च पुढाकार घेऊन घरांचा ताबा घ्यावा. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना मदत करेल, असेही ते म्हणाले. मराठी माणसाच्या नावाने मते मागणाऱ्या शिवसेनेने ठरवल्यास कामगारांना तत्काळ घरे मिळू शकतात. मात्र त्यासाठी सरकारमध्ये असलेल्या सेनेने भाजपावर दबाव टाकण्याची गरज आहे. तसे झाल्यास कामगारांना सहज घरे उपलब्ध होतील. त्यामुळे भाजपा कामगारांना घरे देण्यास दिरंगाई करीत असेल तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.इतर कामगार वर्गाचा पाठिंबामाथाडी कामगार व डबेवाल्यांनीही गिरणी कामगारांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यापुढे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नाही, तर डबेवाले आणि माथाडी कामगारही गिरणी कामगारांसोबत लढ्यात उतरणार असल्याचे जाहीर केले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्षमंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न समजून घेतले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका गुरुवारी विधान भवनात जाहीर करणार असल्याचे सांगितले. मात्र नेमके काय जाहीर करणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणताही खुलासा केला नसल्याने गिरणी कामगारांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.