शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घ्यावा!

By admin | Updated: January 6, 2016 01:43 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे.

मुंबई : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे. जैन समाजानेही दुष्काळात जनावरांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा यात्रा ३००’ या कार्यक्रमांतर्गत आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांच्या ३०० व्या ‘मारुं भारत, सारुं भारत’ पुस्तकासह ५ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांना आपण पहिल्यांदा औरंगाबादमध्ये भेटलो होतो. तेव्हा आपण त्यांना महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांना शब्द दिल्यानंतर राज्य शासनाने पहिल्या महिन्यातच राज्यात गोवंश हत्या बंदी लागू केली.’‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांनी जीवन कसे जगावे याचा बहुमूल्य संदेश दिला आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी केवळ धर्माचीच नाही, तर मानवतेची आणि देशाची सेवा केली आहे, म्हणूनच रत्नसुंदरसुरीश्वरजी हे राष्ट्रीय संत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भौतिक सुखाच्या पुढे जाऊन जीवनात आपल्याला उच्चतम मूल्य कसे मिळेल, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी आध्यात्मिक शक्ती महत्त्वाची आहे,’ असेही ते म्हणाले.