शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घ्यावा!

By admin | Updated: January 6, 2016 01:43 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे.

मुंबई : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे. जैन समाजानेही दुष्काळात जनावरांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सायन येथील सोमय्या मैदानावर ‘साहित्य सत्कार सोहळा यात्रा ३००’ या कार्यक्रमांतर्गत आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांच्या ३०० व्या ‘मारुं भारत, सारुं भारत’ पुस्तकासह ५ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांना आपण पहिल्यांदा औरंगाबादमध्ये भेटलो होतो. तेव्हा आपण त्यांना महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांना शब्द दिल्यानंतर राज्य शासनाने पहिल्या महिन्यातच राज्यात गोवंश हत्या बंदी लागू केली.’‘रत्नसुंदरसुरीश्वरजी यांनी जीवन कसे जगावे याचा बहुमूल्य संदेश दिला आहे. त्यांच्या विचारांनी अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी केवळ धर्माचीच नाही, तर मानवतेची आणि देशाची सेवा केली आहे, म्हणूनच रत्नसुंदरसुरीश्वरजी हे राष्ट्रीय संत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भौतिक सुखाच्या पुढे जाऊन जीवनात आपल्याला उच्चतम मूल्य कसे मिळेल, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी आध्यात्मिक शक्ती महत्त्वाची आहे,’ असेही ते म्हणाले.