शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

कोंढवा कत्तलखान्याचा निर्णय तातडीने घ्या

By admin | Updated: January 20, 2015 00:44 IST

कत्तलखाना ही अत्यावश्यक सेवा असून, महापालिकेने केंद्रशासनाच्या निधीतून उभारलेल्या अत्याधुनिक कत्तलखान्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा,

पुणे : कत्तलखाना ही अत्यावश्यक सेवा असून, महापालिकेने केंद्रशासनाच्या निधीतून उभारलेल्या अत्याधुनिक कत्तलखान्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, महापालिका निर्णय घेत नसेल तर पालिका बरखास्त का करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. केंद्रशासनाच्या अनुदानातून सात कोटी रुपये खर्च करून महापालिकेने बांधलेल्या कत्तलखान्याच्या खासगीकरणास पालिका स्थायी समितीने आॅगस्ट २0१२ मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक स्वयंसेवी संघटना, वारकरी, हिंदू संघटनांनी कत्तलखान्याच्या खासगीकरणाला विरोध केल्यामुळे पुण्यात चांगलेच वातावरण तापले होते. अखेर स्थायी समितीने आणि मुख्य सभेने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही थांबविली होती. या निर्णयाविरोधात आॅल इंडिया जमायतुल कुरेश यांनी २0१३ मध्ये उच्च न्यायालयामध्ये स्थायी समितीने मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, म्हणून दावा दाखल केला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाला न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. पदनिर्मिती, शासनाची मान्यता यासाठी तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. उच्च न्यायालयाने यावर ६ मार्च २0१४ रोजी अंतिम आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने तीन महिन्यांच्या आतमध्ये पदनिर्मितीची कार्यवाही करावी राज्य शासनाची मान्यता घ्यावी, असे नमूद केले होते. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात न आल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, पालिकेला शेवटी संधी दिली आहे. त्यानुसार फेरविचार करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच स्थायी समितीने हा कत्तलखाना खासगीकरणाने चालवावा अथवा पालिकेने चालवावा यासाठीचे दोन्ही ठराव रद्द केल्याबाबत याबाबतचा मुख्य सभेचा निर्णय न्यायालयाला २ फेबु्रवारी २0१५ पर्यंत कळवायचा आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी फेरविचार मुख्य सभेला सादर केला आहे. मात्र, प्रस्ताव सादर होताच त्यास भाजप, मनसेने आक्षेप घेतला. तसेच हा विषय कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. हा न्यायालयीन विषय असल्याने तो दाखल करून घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)काय आहे आयुक्तांचा प्रस्ताव?४कत्तलखाना अत्यावश्यक सेवा असून, सेवक निर्मिती व आर्थिक तरतूद म्हणून ४ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद अधिक १0 टक्के दरवाढ या स्थायी समिती तसेच मुख्य सभेच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा.४पदनिर्मिती, आकृतिबंध व आर्थिक तरतूद करणे अडचणीचे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता घेऊन सहा महिन्यांच्या मुदतवाढीने निविदा प्रक्रिया राबवून कत्तलखाना खासगीकरणाद्वारे चालवावा.४तसेच स्थायी समिती तसेच मुख्य सभेने दप्तरी दाखल केलेल्या खासगीकरण तसेच महापालिकेने हा कत्तलखाना चालवावा, या दप्तरी दाखल केलेल्या दोन्ही ठरावांचा फेरविचार करावा.