शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

मराठी माणसाला हाकलण्याचा डाव

By admin | Updated: March 10, 2015 04:26 IST

बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी

मुंबई : बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी माणसांच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याने त्या प्रकल्पालाही त्यांनी विरोध केला. मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास आपण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.मनसेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचा बारकाईने अभ्यास केला असता व तज्ज्ञांशी चर्चा केली असता हा आराखडा मराठी माणसाला मुंबईतून हाकलून लावण्याचा कट आहे. मुंबई अशी सरळ ताब्यात घेता येत नसेल तर टॉवरद्वारे ताब्यात घेण्याची योजना आहे. आराखड्यातील एफएसआय वाढीचा प्रस्ताव मराठी माणसाच्या हिताचा नाही. सध्या मुंबईत जे टॉवर उभे राहत आहेत त्यामध्ये मराठी माणसाला राहायला जागा नाही. त्याला तेथून हुसकावून लावले जाते. केवळ शाकाहारी लोकांना अनेक ठिकाणी घरे दिली जातात. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात गिरगावातील मराठी माणसांच्या घरावरच नांगर का फिरवला जाणार आहे, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मलबार हिलवरून मेट्रो रेल्वे का नेण्यात येणार नाही. गोराई येथील १५०० एकर जमीन ना विकास क्षेत्रातून बाहेर काढण्याचा निर्णय हा कुणाच्या फायद्याकरिता घेतला गेला आहे? या जमिनी अगोदरच उद्योगपतींनी विकत घेतल्या असून, त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले आहे. आरे कॉलनीमधील झाडांची कत्तलही काही विशिष्ट लोकांना तेथील जमीन हवी असल्याने केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)