शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:08 IST

देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मुंबई : देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१६च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक अपघात होणाºया पाच शहरांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात ३९ हजार ८७८ रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ९३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यातील कारवाई आवश्यक त्या वेगाने झालेली नाही, अशी माहिती परिवहन कार्यालयातून देण्यात आली. यामुळे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वाहने आणि वाहन चालक यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हर स्पीड वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अशा कारणांसह अनुज्ञप्ती (लायसन्स) वैधता, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न बांधणे, नियमांनुसार नंबरप्लेट नसणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी बसणे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसवणा-यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहन तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.>अपघाती मृत्यूची टॉप पाच राज्येराज्ये अपघातीमृत्यूंची संख्याउत्तर प्रदेश १९,३२०तामिळनाडू १७,२१८महाराष्ट्र १२,९३५कर्नाटक ११,१३३राजस्थान १०,४६५