शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:08 IST

देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मुंबई : देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१६च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक अपघात होणाºया पाच शहरांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात ३९ हजार ८७८ रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ९३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यातील कारवाई आवश्यक त्या वेगाने झालेली नाही, अशी माहिती परिवहन कार्यालयातून देण्यात आली. यामुळे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वाहने आणि वाहन चालक यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हर स्पीड वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अशा कारणांसह अनुज्ञप्ती (लायसन्स) वैधता, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न बांधणे, नियमांनुसार नंबरप्लेट नसणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी बसणे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसवणा-यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहन तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.>अपघाती मृत्यूची टॉप पाच राज्येराज्ये अपघातीमृत्यूंची संख्याउत्तर प्रदेश १९,३२०तामिळनाडू १७,२१८महाराष्ट्र १२,९३५कर्नाटक ११,१३३राजस्थान १०,४६५