शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

गोंड समाजातील चिमुकल्यांच्या हाती ‘टॅब’

By admin | Updated: September 6, 2016 03:31 IST

१९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत.

राजकुमार जोंधळे,

लातूर- १९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत. केवळ शाळाच नव्हे, तर त्यांच्या हाती टॅबही आला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील बाभळगावच्या वैशालीनगरात राहणाऱ्या गोंड समाजातील या चिमुकल्यांच्या आयुष्याला परिवर्तनाची किनार लाभली आहे.बाभळगावच्या वैशालीनगरात ही ५० कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने कानमळ काढणे, मालिश करणे आणि गावोगावी वनऔषधी विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. यातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. केवळ शिक्षणाचा अभाव असल्यानेच तीन पिढ्यांच्या जीवनात दारिद्र्याची जळमटे होती. आता हा समाज शिक्षणाच्या, प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर मार्गक्रमण करतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंड समाजाची ३० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हाती संगणकाचा माऊस आला असून, टॅबवर ही मुले आपल्या आयुष्याला आकार देऊ लागली आहेत. पाच-पन्नास रुपयांसाठी दिवसभर भटकंती करणाऱ्या समाजाला शिक्षणाचा मार्ग हाती लागला आहे. परिणामी, प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालण्याचे स्वप्न या चिमुकल्यांच्या आई-बाबांचे आहे. >दारिद्र्याशी चार पिढ्यांचा संघर्ष...दारिद्र्याशी नाते सांगणाऱ्या चौथ्या पिढ्यांनी आता शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता मार्गावरून पुन्हा मागे वळून पाहायचे नाही, असा निर्धारच येथील अजय जामकर, किशन श्यामराव जामकर, श्याम जामकर आणि विशाल जामकर यांनी केला आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हेच आम्हाला आता पटले आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.