शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोंड समाजातील चिमुकल्यांच्या हाती ‘टॅब’

By admin | Updated: September 6, 2016 03:31 IST

१९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत.

राजकुमार जोंधळे,

लातूर- १९७२च्या भीषण दुष्काळात भटकंती करत आलेल्या चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड समाजातील चौथ्या पिढीची पावले शाळेच्या दिशेने वळली आहेत. केवळ शाळाच नव्हे, तर त्यांच्या हाती टॅबही आला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील बाभळगावच्या वैशालीनगरात राहणाऱ्या गोंड समाजातील या चिमुकल्यांच्या आयुष्याला परिवर्तनाची किनार लाभली आहे.बाभळगावच्या वैशालीनगरात ही ५० कुटुंबे गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने कानमळ काढणे, मालिश करणे आणि गावोगावी वनऔषधी विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. यातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. केवळ शिक्षणाचा अभाव असल्यानेच तीन पिढ्यांच्या जीवनात दारिद्र्याची जळमटे होती. आता हा समाज शिक्षणाच्या, प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर मार्गक्रमण करतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंड समाजाची ३० मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हाती संगणकाचा माऊस आला असून, टॅबवर ही मुले आपल्या आयुष्याला आकार देऊ लागली आहेत. पाच-पन्नास रुपयांसाठी दिवसभर भटकंती करणाऱ्या समाजाला शिक्षणाचा मार्ग हाती लागला आहे. परिणामी, प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालण्याचे स्वप्न या चिमुकल्यांच्या आई-बाबांचे आहे. >दारिद्र्याशी चार पिढ्यांचा संघर्ष...दारिद्र्याशी नाते सांगणाऱ्या चौथ्या पिढ्यांनी आता शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता मार्गावरून पुन्हा मागे वळून पाहायचे नाही, असा निर्धारच येथील अजय जामकर, किशन श्यामराव जामकर, श्याम जामकर आणि विशाल जामकर यांनी केला आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हेच आम्हाला आता पटले आहे, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.