शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुनील जोशी प्रकरणी तलवारी म्यान

By admin | Updated: November 7, 2014 05:01 IST

लाचखोरीचा आरोप असलेले केडीएमसीतील अधिकारी सुनील जोशी यांच्या पालिका सेवेतील पुनरागमनामुळे आयुक्त रामनाथ सोनवणे

कल्याण : लाचखोरीचा आरोप असलेले केडीएमसीतील अधिकारी सुनील जोशी यांच्या पालिका सेवेतील पुनरागमनामुळे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आणि पत्रकबाजी करणाऱ्यांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या आहेत. या प्रकरणी बराच गदारोळ झाल्यानंतरही जोशीने बिनदिक्कतपणे महापालिकेत ‘एण्ट्री’ केली. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या इशाऱ्यांचे काय झाले, असा सवाल करण्यात येत आहे.दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा शासन निर्णय आहे. त्याआधारे जोशीला सेवेत घेण्याचा आयुक्तांचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. भ्रष्टाचाराला थारा नाही, अशी सदैव ग्वाही देणाऱ्या सोनवणे यांच्यावर वरिष्ठांच्या दबावामुळेच एका भ्रष्ट अधिकाऱ्याला थारा देण्याची नामुश्की ओढवल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. मात्र, कोणाचाही दबाव नाही. जोशीसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमानुसारच कामावर घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयात धाव घेऊन आयुक्तांना जाब विचारला होता. यानंतर, जाग आलेल्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपानेही पत्रकबाजी करून आयुक्तांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करावी लागली. भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना टार्गेट करताना भ्रष्टाचाराला साथ दिल्यास पालिकेतील युती तोडण्याची धमकी दिली होती. यावर युती तोडण्याची भाषा करणारे पवार कोण, असा सवाल करून कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी शिवसेनेने भ्रष्टाचाराला कधीच थारा दिला नाही. जोशीला आमचा विरोध कायम आहे, असा दावा केला होता़ वेळप्रसंगी आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला होता. या प्रकरणात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा विरोध असताना राष्ट्रवादीनेही पत्रकबाजी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सेवेत घेऊ नये, असा ठराव महासभेत झाला आहे. त्याचाही विसर नगरसेवकांना पडला आहे. (प्रतिनिधी)