शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

कार्यालयाची तोडफोड : कर्मचारी पळाले; थकित बिले देण्याची मागणी

सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ ते गेले. या विभागातच ऊस तोडणी, संगणक, रोखपाल व साखर विभाग आहे. तिथे प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असलेल्या खिडकीवर कार्यकर्त्यांनी लाथा मारून काचा फोडल्या. तिथे सभासदांच्या माहितीसाठी लावलेला सूचना फलक काढून टाकला. अध्यक्षासह २३ जणांविरुद्ध गुन्हाकारखान्यातील रखवालदार पांडुरंग राजू बंडगर यांनी सायंकाळी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानीचे मिरज तालुका अध्यक्ष महावीर पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज) यांच्यासह २० ते २३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबिन, टेबल व खिडक्यांच्या काचा फोडून ४० ते ५० हजारांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.नाकाबंदी... बंदोबस्त तैनातहल्ला झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी हल्ल्याची सर्व माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर शहर व परिसरात नाकाबंदी केली होती. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक : राजू शेट्टीखासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. वसंतदादा कारखान्यावर हल्ला झाल्याचे मला समजले आहे. कारखान्याचे प्रशासन दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देत नसेल, तर आणखी काय होणार? बिले कधी देणार, यासाठी फोन केला, तर फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी काही बिया किंवा खतांची चोरी केलेली नाही. त्यांनी कष्टाने उसाचे पीक उभे करुन तुमच्या कारखान्याला ऊस घातला. मग त्याची बिले वेळेत द्यायला नको का? हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. जिल्ह्यातून अन्य कारखान्यांनी यातून काय समजून घ्यायचे ते घ्यावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही तोडफोड केल्याचे वाटत नाही. संघटना कधीच अशी कृती केल्याचे दिसले नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. वसंतदादा कारखाना बंद पडल्याशिवाय ज्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही, अशा नेत्यांचेच हे कृत्य असावे. - विशाल पाटील, अध्यक्ष वसंतदादा साखर कारखाना,सांगली