शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

कार्यालयाची तोडफोड : कर्मचारी पळाले; थकित बिले देण्याची मागणी

सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ ते गेले. या विभागातच ऊस तोडणी, संगणक, रोखपाल व साखर विभाग आहे. तिथे प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असलेल्या खिडकीवर कार्यकर्त्यांनी लाथा मारून काचा फोडल्या. तिथे सभासदांच्या माहितीसाठी लावलेला सूचना फलक काढून टाकला. अध्यक्षासह २३ जणांविरुद्ध गुन्हाकारखान्यातील रखवालदार पांडुरंग राजू बंडगर यांनी सायंकाळी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानीचे मिरज तालुका अध्यक्ष महावीर पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज) यांच्यासह २० ते २३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबिन, टेबल व खिडक्यांच्या काचा फोडून ४० ते ५० हजारांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.नाकाबंदी... बंदोबस्त तैनातहल्ला झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी हल्ल्याची सर्व माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर शहर व परिसरात नाकाबंदी केली होती. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक : राजू शेट्टीखासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. वसंतदादा कारखान्यावर हल्ला झाल्याचे मला समजले आहे. कारखान्याचे प्रशासन दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देत नसेल, तर आणखी काय होणार? बिले कधी देणार, यासाठी फोन केला, तर फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी काही बिया किंवा खतांची चोरी केलेली नाही. त्यांनी कष्टाने उसाचे पीक उभे करुन तुमच्या कारखान्याला ऊस घातला. मग त्याची बिले वेळेत द्यायला नको का? हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. जिल्ह्यातून अन्य कारखान्यांनी यातून काय समजून घ्यायचे ते घ्यावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही तोडफोड केल्याचे वाटत नाही. संघटना कधीच अशी कृती केल्याचे दिसले नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. वसंतदादा कारखाना बंद पडल्याशिवाय ज्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही, अशा नेत्यांचेच हे कृत्य असावे. - विशाल पाटील, अध्यक्ष वसंतदादा साखर कारखाना,सांगली