शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

कार्यालयाची तोडफोड : कर्मचारी पळाले; थकित बिले देण्याची मागणी

सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ ते गेले. या विभागातच ऊस तोडणी, संगणक, रोखपाल व साखर विभाग आहे. तिथे प्रवेश करण्यापूर्वी बाहेर असलेल्या खिडकीवर कार्यकर्त्यांनी लाथा मारून काचा फोडल्या. तिथे सभासदांच्या माहितीसाठी लावलेला सूचना फलक काढून टाकला. अध्यक्षासह २३ जणांविरुद्ध गुन्हाकारखान्यातील रखवालदार पांडुरंग राजू बंडगर यांनी सायंकाळी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्वाभिमानीचे मिरज तालुका अध्यक्ष महावीर पाटील (रा. नांद्रे, ता. मिरज) यांच्यासह २० ते २३ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबिन, टेबल व खिडक्यांच्या काचा फोडून ४० ते ५० हजारांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.नाकाबंदी... बंदोबस्त तैनातहल्ला झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. तोपर्यंत कार्यकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी हल्ल्याची सर्व माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर शहर व परिसरात नाकाबंदी केली होती. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक : राजू शेट्टीखासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीत आहे. वसंतदादा कारखान्यावर हल्ला झाल्याचे मला समजले आहे. कारखान्याचे प्रशासन दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देत नसेल, तर आणखी काय होणार? बिले कधी देणार, यासाठी फोन केला, तर फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांनी काही बिया किंवा खतांची चोरी केलेली नाही. त्यांनी कष्टाने उसाचे पीक उभे करुन तुमच्या कारखान्याला ऊस घातला. मग त्याची बिले वेळेत द्यायला नको का? हा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आहे. जिल्ह्यातून अन्य कारखान्यांनी यातून काय समजून घ्यायचे ते घ्यावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही तोडफोड केल्याचे वाटत नाही. संघटना कधीच अशी कृती केल्याचे दिसले नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत. वसंतदादा कारखाना बंद पडल्याशिवाय ज्यांची राजकीय पोळी भाजली जाणार नाही, अशा नेत्यांचेच हे कृत्य असावे. - विशाल पाटील, अध्यक्ष वसंतदादा साखर कारखाना,सांगली