शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:51 IST

Swami Govind Dev Giri Maharaj News: ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असा पलटवार गोविंददेव गिरी महाराज यांनी केला.

Swami Govind Dev Giri Maharaj News: अयोध्येत राम मंदिर लोकार्पण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. मात्र, यावरून टीका झाली. या टीकेला गोविंददेव गिरी महाराज यांनी उत्तर दिले आहे. 

गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना केली, असा दावा करत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. यावर गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आपण टीका करतो. त्याप्रमाणे सद्गुणांचा गौरव करण्यात कुठलाही संकोच वाटत नाही. ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, या शब्दांत गोविंददेव गिरी महाराजांनी पलटवार केला.

शिवरायांच्या गुणांचे अनुसरण PM करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही

माझ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही करणार नाही. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णानंतर छत्रपती शिवाजी महाराज मला सर्वश्रेष्ठ वाटतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचे अनुसरण काहीजण करतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आहेत. हे सांगण्यात मला कुठलाही संकोच वाटला नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेल्या गुणांचे अनुसरण पंतप्रधान आपल्या जीवनात करताना दिसत आहे, असे गोविंददेव गिरी महाराज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

नेमके काय म्हणाले होते गोविंददेव गिरी महाराज?

एखादे परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. मला राज्य करायचे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले. समर्थ रामदास स्वामी यांचीही यावेळी आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार काढताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते की, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी. आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMahavikas Aghadiमहाविकास आघाडी