शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

घुमानला साहित्य महामंडळाची संस्थाच नाही?

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत

महामंडळाचे स्वत:च्याच नियमांकडे दुर्लक्ष : हा तुघलकी कारभार असल्याची चर्चा राजेश पाणूरकर - नागपूर साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहित्याच्या माध्यमातून दोन प्रांताची जवळीक आणि सलोखा वाढत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. पण हे संमेलन आयोजित करताना महामंडळाने पुन्हा स्वत:च्याच घटनेकडे आणि नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या संदर्भात महामंडळ अडचणीत आले असताना, पंजाबला साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या उत्साहात महामंडळाने सारीच कामे घटनाबाह्य केल्याने त्याची उलटसुलट चर्चाही रंगली आहे. कुठल्याही संस्थेचा कारभार निश्चित नियमाने चालावा यासाठीच नियम आणि घटना तयार केली जाते. अन्यथा महामंडळाची घटना तयार करण्याचा प्रयत्नच झाला नसता. पण साहित्य क्षेत्रातल्या बुद्धिवंतांनी मात्र बेदरकारपणेच वागायचे असे ठरविले असावे. विश्व साहित्य संमेलनाबाबतचे सारेच वाद सुरूच आहेत. त्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतही यंदा महामंडळाने स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे. महामंडळाच्या घटनेप्रमाणे स्थळ निवड समिती महत्त्वाची आहे. यात महामंडळाचे चार प्रतिनिधी, प्रत्येक घटक संस्थेचा एक पदाधिकारी आणि ज्या समाविष्ट व संलग्न संस्थेच्या कार्यक्षेत्रात हे संमेलन होत असेल तर तेथील एक प्रतिनिधी स्थळ निवड समितीत असल्याशिवाय स्थळ निवड समिती पूर्णच होत नाही. घुमानला महामंडळाची समाविष्ट किंवा संलग्न संस्थाच नाही. कौतिकराव ठाले पाटील यांनीही पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्या वेळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनच विदेशात करण्याचा घाट घातला होता. महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर राहील, या घटनेच्या आधारावर अ.भा. संमेलनही विदेशात होऊ शकते, असा तर्क त्यावेळी लढविण्यात आला होता. पण महामंडळाची कुठलेही घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्था विदेशात नसल्यामुळेच विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण घटनात्मक तरतुदी न करता विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याने हे संमेलनच अडचणीत आले. हा मुद्दा अद्यापही निकालात निघाला नाही. आता घुमानला साहित्य संमेलन आयोजित करताना महामंडळ पुन्हा त्याच मुद्यावर आले आहे. घुमानला साहित्य संमेलन होणार, ही समस्त मराठी रसिकांसाठी आनंदाचीच बाब असली तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यातच महामंडळ धन्यता मानते आहे आणि पुन्हा स्वत:वर नामुष्की ओढवून घेते आहे. घटनेप्रमाणे महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर आहेच. पण त्यासाठी महामंडळाच्या नियमाप्रमाणे संमेलन घेण्यासाठी घुमानला संलग्न वा समाविष्ट संस्था असणे गरजेचे आहे. नसल्यास तशी संस्था स्थापन करून नंतरच हे संमेलन तेथे घेणे सर्वथा योग्य आहे. पण महामंडळाने तेथे संलग्न वा समाविष्ट संस्थेबाबत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने हे संमेलन वैध की अवैध, असा मुद्दा विश्व साहित्य संमेलनाप्रमाणेच गाजणार असल्याचे चिन्ह आहे. संलग्न वा समाविष्ट संस्था घुमानला नसल्याने मुळात नियमाप्रमाणे स्थळ निवड समितीच संपूर्ण होत नाही. त्यामुळे स्थळ निवड समितीपासून आयोजनापर्यंत सारेच अवैध कार्य महामंडळासारख्या साहित्य क्षेत्रात शीर्षस्थ संस्थेने करावे, हे कुणाच्याही तर्काला पटणारे नाही. घटना, नियम काही प्रमाणात माणसाच्या सुविधेसाठी वाकविले वा शिथिल केले जाऊ शकतात हे मान्य आहे. पण संपूर्ण घटनाच नाकारणे हा करंटेपणा आहे.पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्यावेळी चार घटक संस्थेपैकी तीन संस्थांच्या वकिलांनीही याच मुद्यावर अ.भा. मराठी साहित्य संमेलन विदेशात घेणे योग्य नाही, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अ.भा.ऐवजी विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. याच्या सर्व प्रती आणि अहवाल खुद्द महामंडळाकडेच उपलब्ध आहे. पण यातून महामंडळाने धडा घेतल्याचे दिसत नाही.