शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय

By admin | Updated: April 23, 2017 20:24 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे.

ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि. 23 - स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे. मग सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा  सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. 
 
29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळालच पाहिजे. आपल्या देशात कोणते रत्न जन्माला आले हे जगाला कळावे म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा. आता केंद्रात सरकार आपलेच असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे.  यावेळी सावरकरप्रेमींना सावरकर किती समजले हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 
 
सावरकर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास  राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची आपली भूमिका मांडली. "सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल, असेही ते म्हणाले.