शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय

By admin | Updated: April 23, 2017 20:24 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे.

ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि. 23 - स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे. मग सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा  सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. 
 
29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळालच पाहिजे. आपल्या देशात कोणते रत्न जन्माला आले हे जगाला कळावे म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा. आता केंद्रात सरकार आपलेच असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे.  यावेळी सावरकरप्रेमींना सावरकर किती समजले हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 
 
सावरकर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास  राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची आपली भूमिका मांडली. "सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल, असेही ते म्हणाले.