शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

बहीण, भावाचा संशयास्पद मृत्यू; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

By admin | Updated: August 10, 2015 00:36 IST

चिखली, संग्रामपूरमध्ये खळबळ ; पालक वर्गात चिंता.

बुलडाणा : दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील चिमुकल्या बहिण, भावाचे मृतदेह रविवारी सायंकाळी शेतातील एका विहिरीमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण झाल्याची आणखी एक घटना उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. अंत्री खेडेकर येथील निलेश प्रल्हाद खेडेकर हे रविवारी दुपारी त्यांच्या जावयासोबत शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्यामागे मुलगी मानसी (८) आणि मुलगा आयुष (४) हेदेखील शेतात गेले. खेडेकर यांनी मुलांना घरी जाण्यास सांगितले; मात्र संध्याकाळपर्यंंत दोघेही घरी परतलेच नाही. त्यामुळे आई वडीलांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील इतर गावांमध्येही शोध घेतला; मात्र त्यांचा थांगपत्ता न लागल्यामुळे मुलांच्या वडीलांनी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरा अंत्री खेडेकर शिवारातील शेतातील एका विहिरीत या भावंडाचे मृतदेह आढळून आले. दोन्ही चिमुकले खेळता-खेळता विहीरीत पडले की, यामागे काही घातपात आहे, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. दरम्यान, संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे दहावीचे दोन विद्यार्थी शनिवारपासून बेपत्ता झाल्याची आणखी एक घटना रविवारी उजेडात आली. काशीराम शालीग्राम उमाळे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सुरज (१५) व त्याचा मित्र अजहर (१६) हे ८ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजता शाळेत जात होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने दोन्ही मुलांचे अपहरण केल्याचा आरोप उमाळे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिखली येथील दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू आणि संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण, अशा दोन घटना एकाच दिवशी उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.