शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बहीण, भावाचा संशयास्पद मृत्यू; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

By admin | Updated: August 10, 2015 00:36 IST

चिखली, संग्रामपूरमध्ये खळबळ ; पालक वर्गात चिंता.

बुलडाणा : दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील चिमुकल्या बहिण, भावाचे मृतदेह रविवारी सायंकाळी शेतातील एका विहिरीमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण झाल्याची आणखी एक घटना उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. अंत्री खेडेकर येथील निलेश प्रल्हाद खेडेकर हे रविवारी दुपारी त्यांच्या जावयासोबत शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्यामागे मुलगी मानसी (८) आणि मुलगा आयुष (४) हेदेखील शेतात गेले. खेडेकर यांनी मुलांना घरी जाण्यास सांगितले; मात्र संध्याकाळपर्यंंत दोघेही घरी परतलेच नाही. त्यामुळे आई वडीलांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील इतर गावांमध्येही शोध घेतला; मात्र त्यांचा थांगपत्ता न लागल्यामुळे मुलांच्या वडीलांनी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरा अंत्री खेडेकर शिवारातील शेतातील एका विहिरीत या भावंडाचे मृतदेह आढळून आले. दोन्ही चिमुकले खेळता-खेळता विहीरीत पडले की, यामागे काही घातपात आहे, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. दरम्यान, संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे दहावीचे दोन विद्यार्थी शनिवारपासून बेपत्ता झाल्याची आणखी एक घटना रविवारी उजेडात आली. काशीराम शालीग्राम उमाळे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सुरज (१५) व त्याचा मित्र अजहर (१६) हे ८ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजता शाळेत जात होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने दोन्ही मुलांचे अपहरण केल्याचा आरोप उमाळे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिखली येथील दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू आणि संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण, अशा दोन घटना एकाच दिवशी उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.