शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

अशोभनीय वर्तनामुळे आमदारांचे निलंबन!

By admin | Published: March 25, 2017 12:39 AM

विरोधी पक्षाच्या १९ आमदरांचे निलंबन हे ते कर्जमाफीची मागणी करीत होते म्हणून केलेले नाही तर त्यांनी सभागृहात

मुंबई : विरोधी पक्षाच्या १९ आमदरांचे निलंबन हे ते कर्जमाफीची मागणी करीत होते म्हणून केलेले नाही तर त्यांनी सभागृहात केलेले अशोभनीय वर्तन आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्यामुळे केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या निलंबनाचे जोरदार समर्थन केले. शिवसेनेच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याचे प्रयत्नही विरोधकांनी करून पाहिले पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली कर्जमाफीबाबत चर्चा झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला. डॉ.जयप्रकाश मुंदडा, अनिल कदम, सुभाष साबणे, विजय औटी, आशिष देशमुख, भीमराव धोंडे आणि मंगलप्रभात लोढा या भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक माणसाच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब असलेला अर्थसंकल्प हा एक संवैधानिक दस्तावेज आहे. त्याच्या प्रती विरोधकांनी जाळल्या. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करीत असताना कर्जमाफीच्या मागणीसारखा गंभीर विषय विरोधकांनी चेष्टेचा आणि थट्टेचा केला. अशोभनीय वर्तन करीत चेष्टा केली. त्यामुळे त्यांना निलंबित करावे लागले. कर्जमाफीची मागणी तर भाजपा-शिवसेनेच्याही सदस्यांनी केलेली होती मात्र त्यांचे वर्तन तसे नव्हते. मात्र विरोधक या मुद्यावर उघडे पडले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचीच राज्य शानसाची भूमिका आहे आणि त्यासाठीच आम्ही केंद्राकडे मदतही मागितली आहे. ती आम्हाला मिळेल,असा विश्वास आहे. शेती व्यवसाय हा परवडणारा व्हावा यासाठी एकरी उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर आपल्या सरकारने भर दिला असून त्यासाठी ३० हजार कोटी रुपये दिले जात आहेत. या शिवाय, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीतून शेतमालाला देशविदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतीचे अर्थशास्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)