शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

एका 'सिगार'ने 'चिंगारी'चे काम केल्याचा संशय

By admin | Updated: June 3, 2016 19:54 IST

पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून

- राजेश भोजेकर,

वर्धा, दि. 3 -  पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून देशभरातील तपास यंत्रणाही कामाला लागलेल्या आहेत. या यंत्रणेने या दिशेने तपास केल्यास या बाबीचा उगलडा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्री शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट होण्यापूर्वी आग लागली असे प्राथमिक कारण आतापर्यंत पुढे करण्यात आले आहे. मग ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधणेही तेवढेच गरजेचे आहे. आग रात्रीला ११ अचानक आग लागल्याचे माहिती झाले आणि लष्करी यंत्रणा कामाला लागली. वास्तविक, आगीचे हे रुप धारण करण्यापूर्वी ती काही तासांपूर्वीपासून धुमसत असावी, असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. मग आगीची नेमकी सुरूवात कुठून आणि केव्हा झाली, ही बाबही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे.

या दारूगोळा भांडारातील बहुतांश अधिकारी आणि जवानांना सिगारेट ओढण्याचा शोक असल्याची विश्वसनीय माहिती आहे. येथील सुरक्षा यंत्रणा नेहमी सजग असते. त्यामुळे आत प्रवेश करताना सर्व बाबींची तपासणी झाल्याची खात्री पटल्यानंतरच प्रवेश दिला जातो. असे असतानाही येथील अधिकारी वर्ग सिगारेट घेऊन बिनदिक्कतपणे भांडारात प्रवेश करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली.
 
प्रवेशद्वारावर या अधिकाºयांना हटकणे म्हणजे साहेबांना ज्ञान सांगण्यासारखे आहे. वास्तविक, भांडारात अधिकाºयांना किती दारूगोळा गेला आणि किती आला, याचाच हिशेब ठेवावा लागतो. यापेक्षा दुसरे मोठे जबाबदारीचे काम नसल्यामुळे येथला अधिकारी वर्ग सिगारेट ओढत असल्याची माहितीही सूत्राने दिली. याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बॉम्बस्फोटापूर्वी लागलेल्या आगीसाठी ‘चिंगारी’चे काम सिगारेटने केले असण्याची दाट शक्यताही सूत्रांकडून वर्तविली जात असली तरी तपासात काय  निष्पन्न होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
 
सुकलेले गवत आणि सिगार
दारूगोळा भांडाराला आग लागल्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. या आगीच्या घटना होऊ नये, याची खबरदारी म्हणून भांडाराच्या संरक्षण भिंतीच्या आतील सुकलेले गवत काढण्याचा कंत्राट दिला जातो, अशी माहिती आहे. यावर्षी हे गवत कापण्यात आले नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सिंगारची चिंगारी आणि सुकलेले गवत या आगीला कारणीभूत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.